शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

विमानतळावर साध्वीच्या बॅगमध्ये सापडली मानवी कवटी; सुरक्षा रक्षकांमध्ये उडाली एकच खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 09:06 IST

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सोमवारी एका साध्वीच्या बॅगमध्ये मानवी कवटी आणि अस्थि आढळून आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली.

मध्य प्रदेशच्या इंदूरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सोमवारी एका साध्वीच्या बॅगमध्ये मानवी कवटी आणि अस्थि आढळून आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. साध्वीच्या बॅग्सची स्कॅनिंग होत असताना बॅगमध्ये मानवी कवटी आढळून आली. त्यानंतर तात्काळ याची पोलिसांना माहिती देण्यात आली. संबंधित सामान घेऊन जाण्यासंदर्भात कोणतीही परवानगी नसल्यामुळे ते जप्त करण्यात आलं तर साध्वीला दिल्लीला रवाना होऊ देण्यात आलं. 

विमानतळावर तैनात सुरक्षा अधिकारी मानवी कवटी बॅगमध्ये असल्याचं पाहताच हैराण झाले होते. बॅग एका साध्वीची असल्याचं कळाल्यानंतर त्याबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली. धर्म नगरी म्हणून ओळख असलेल्या उज्जैमधील एका आश्रमातील साध्वी योगमाता दिल्लीसाठी विमानानं रवाना होणार होत्या. त्यासाठी त्या स्थानिक विमानतळावर पोहोचल्या होत्या. प्रवाशांच्या तपासणीच्या प्रक्रिये अंतर्गत विमानतळावर साध्वी यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या सामनाचीही तपासणी केली गेली. विमानतळावरील स्कॅनरमध्ये साध्वींच्या एका बॅगमध्ये मानवी कवटी असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता साध्वीनं संबंधित कवटी आपल्या दिवंगत धर्मगुरूची असून तिचं विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अशापद्धतीचं कोणतंही सामान घेऊन जाण्यासाठी सुरक्षा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी साध्वींकडून घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेनं संबंधित सामान घेऊन जाण्यास साध्वींना मज्जाव केला. साध्वींचा जबाब नोंदविण्यात आला आणि त्यांना सामानाविना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. 

दिल्लीला रवाना होणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं साध्वीनं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर साध्वींनी आपल्या ओळखीच्या एका व्यक्तीला विमानतळावर बोलावलं आणि मानवी कवटी, अस्थि संबंधित व्यक्तीकडे सोपवलं. त्यानंतर त्या कोणत्याही सामानाविना दिल्लीसाठी रवाना झाल्या. सर्व सुरक्षा चौकशांना सामोरं गेल्यानंतर साध्वींना रात्री उशिराचं विमानाचं तिकीट नियोजित करुन देण्यात आलं. त्यानंतर त्या रवाना झाल्या. 

टॅग्स :IndiaभारतAirportविमानतळ