शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
2
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
3
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
4
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल' थोड्याच वेळात; आकडे समोर येणार, देशाचा कल कळणार
5
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
6
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
7
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
8
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
9
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
10
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
11
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
12
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
13
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
14
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
15
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
16
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
17
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
18
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
19
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
20
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मानवी हक्क संघटनांना गुन्हेगारासारखी वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 3:58 AM

देशातील मानवी हक्क संघटनांना केंद्र सरकार गुन्हेगारांप्रमाणे वागवत आहे, असा आरोप अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक आकार पटेल यांनी केला.

बंगळुरू : देशातील मानवी हक्क संघटनांना केंद्र सरकार गुन्हेगारांप्रमाणे वागवत आहे, असा आरोप अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे कार्यकारी संचालक आकार पटेल यांनी केला. परकीय चलनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने या संस्थेच्या दोन कार्यालयांवर गुरुवारी धाडी टाकल्या होत्या.त्यावर आकार पटेल म्हणाले की, सर्व कायद्यांचे अ‍ॅम्नेस्टी इंडिया काटेकोर पालन करते. पारदर्शकता व विश्वासार्हता हे आमच्या कार्याचे मुख्य सूत्र आहे. या संस्थेला विदेशी देणगी नियंत्रण कायद्यांतर्गत देण्यात आलेला परवाना गृहखात्याने २०१० साली रद्द केला होता.अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया फाऊंडेशन या दोन संस्थांचा परस्परसंबंध काय आहे, याविषयी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्याबद्दल पटेल म्हणाले की, संचालनालयाने मागितलेली सर्व कागदपत्रे समाजमाध्यमांवर आधीच उपलब्ध आहेत. तसेच ही कागदपत्रे याआधीही ईडीला दिली होती. अ‍ॅम्नेस्टी इंडियाच्या विद्यमान रचनेची माहिती संस्थेच्या वेबसाईटवर २०१४ पासून आहे.सहा वर्षांत अ‍ॅम्नेस्टी इंडियाच्या कार्याला ४० लाख भारतीयांनी पाठिंबा दिला, तसेच एक लाख नागरिकांनी संस्थेला देणग्या दिल्या. या संस्थेची बँक खाती ईडीने गोठवली आहेत. अशीच कारवाई ग्रीनपीस इंडिया या संस्थेविरोधात केंद्र सरकारने केली होती. (वृत्तसंस्था)>आणीबाणीची पुनरावृत्तीजगातले कोणतेही राष्ट्र असो, तिथे मानवी हक्क रक्षणासाठी लढा देणे, हे अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्य काम आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसारच आम्ही मानवाधिकारांसाठी काम करीत आहोत. आणीबाणीच्या काळात झालेली दडपशाही हा भारताला लागलेला कलंक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्याच दडपशाहीची आठवण व्हावी अशा घटना सध्या भारतात पुन्हा घडताना दिसत आहेत, अशी टीकाही पटेल यांनी केली.