शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील खटल्यांना प्रचंड विलंब; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली गंभीर चिंता; पीडितांच्या न्यायप्राप्तीवर याचा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:21 IST

२०१९ मध्ये  मुथुट फायनान्सच्या नाशिक शाखेत दरोडा पडला. यात कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपीच्या जामीन अर्जावर  न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमनुल्ला आणि आर. महादेवन यांच्यासमोर सुनावणी झाली.

डॉ. खुशालचंद बाहेती  -

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील फौजदारी खटल्यांना दीर्घ विलंब लागतो, हे वास्तव वारंवार समोर येत असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने यावर गंभीर चिंता व्यक्त केली. “प्रचंड आणि अगम्य विलंब” आरोपींच्या हक्कांवर तसेच पीडितांच्या न्यायप्राप्तीवर परिणाम करतो, असे म्हटले आहे.  

२०१९ मध्ये  मुथुट फायनान्सच्या नाशिक शाखेत दरोडा पडला. यात कर्मचाऱ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपीच्या जामीन अर्जावर  न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमनुल्ला आणि आर. महादेवन यांच्यासमोर सुनावणी झाली. अनेक वर्षांनंतरही खटला विशेष पुढे सरकलेला नाही, याकडे कोर्टाने लक्ष वेधले.   न्यायालयाने विलंबाचे नेमके कारण काय याबाबत नाशिकचे पोलीस आयुक्त यांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.  

प्रलंबित खटलेएकूण प्रलंबित प्रकरणे : सुमारे ५१.७  लाखफौजदारी प्रकरणे : सुमारे ३५.३ लाखदिवाणी प्रकरणे : सुमारे १६.४ लाखपुरावे/युक्तिवाद/निर्णय टप्प्यातील खटले : अंदाजे १० ते ११ लाखखटल्यांचा कालावधी१ वर्षापर्यंत    सुमारे २६%१ ते ३ वर्षे    सुमारे २५%३ ते ५ वर्षे    सुमारे १५%५ ते १० वर्षे    सुमारे २२ %१० वर्षांपेक्षा जास्त    सुमारे ११ %

प्रमुख कारणेसमन्स बजावण्यात विलंब व पक्षकार गैरहजर : सुमारे ५३ % प्रकरणेतुरुंगातून आरोपी हजर न करणे.वकील किंवा सरकारी वकिलांची अनुपस्थिती. आरोपीची कोर्टात दांडीनुकतेच कल्याण (ठाणे ) न्यायालयात पोलिसावर हल्ला केलेल्या कैद्याला ८५ पैकी ५५ तारखांना तुरुंगातून न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. याला सुप्रीम कोर्टाने “धक्कादायक आणि अत्यंत चिंताजनक” असे संबोधले आहे.

जामीन देणाऱ्यावर कारवाई  अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायाधीश पंकज भाटिया यांनी तीन महिन्यात हुंडाबळीच्या ५१० पैकी ५०८ गुन्ह्यांत जामीन दिल्याचे पाहून त्यांच्याकडे जामिनाची प्रकरणे सोपवण्यात येऊ नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि  के. व्ही. विश्वनाथन यांनी दिले आहेत.  सर्वोच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले की, गुन्हेगारी खटल्यांचा वेळेत निपटारा होणे न्यायव्यवस्थेची मूलभूत जबाबदारी आहे. विलंबामुळे न्यायप्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय