शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चिंताजनक! पोलिसांवर हल्ले झाले, तर समाज कसा सुरक्षित राहील?: मद्रास उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 02:04 IST

पोलिसांना ठार मारणाऱ्यांविरुद्ध राजकारण्यांचे मौन

खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : पोलिसांवर वारंवार होणाºया हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करताना असे झाल्यास समाज कसा सुरक्षित राहील, असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. लोक एकत्र येतात, पोलिसांना शिवीगाळ करतात, त्यांच्यावर हल्ले करतात, हे सुरक्षित समाजासाठी चांगले नाही, असेही मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

पोलीस कॉन्स्टेबल पी. सुब्रमण्यम हे वेलू नावाच्या गुंडाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करीत होते. यावेळी त्यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आला व यात त्यांचा मृत्यू झाला. यात वेलूला अटक झाली व तो कारागृहात आहे. ही अटक बेकायदा असल्याचे सांगत वेलूच्या वडिलांनी उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी पी. सुब्रमण्यम यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे अनुदान व एका व्यक्तीस नोकरी देण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, त्यांच्या पक्षासह एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याने या घटनेचा साधा निषेधही केला नाही. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मानवी हक्काचे उल्लंघन होते, म्हणून सतत आंदोलने करणाºया तथाकथित मानवी हक्क कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कोणताही आवाज उठवला नाही. कदाचित त्यांच्या मते पोलीस हे मानव नाहीत आणि त्यांच्या मारण्याने कोणत्याही मानवी हक्काचे उल्लंघन होत नाही, अशी संवेदना न्यायालयाने व्यक्त केली.

सुजित विल्सन हे लहान बाळ त्याच्या वडिलांनीच खोदलेल्या बोअरमध्ये पडले. अथक प्रयत्नांनंतरही त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी राजकारण्यांनी दु:ख व्यक्त करण्यासाठी व मदत देण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यांना मदत देऊ नये, असे नाही; पण हेच मापदंड राजकारण्यांनी पी. सुब्रमण्यम यांना लावले नाहीत, याबद्दल न्यायालयाने दु:ख व्यक्त केले.सत्ताधिकाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांच्या अशा घटनांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे पोलिसांचे मनोधैर्य कमी होईल. त्यामुळे ते निर्भयपणे काम करू शकणार नाहीत. दुर्दैवाने आपल्या जिवाचे काही झालेच तर फक्त सरकारच नाही समाजही त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेईल, हा विश्वास पोलिसांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. न्या. एन. किरूबकरन, न्या. जे. व्ही. एम. वेलू मणी (मद्रास उच्च न्यायालय)

टॅग्स :PoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय