शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

देशातील रस्ते असुरक्षित? दर तासाला 53 अपघात, वर्षाला दीड लाख लोकांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:16 IST

2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात.

नवी दिल्ली : मोटर वाहन(संशोधन) विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकासाठी मोटर वाहन कायदा 1988 मध्ये सुधारणा करुन मंजूर करण्यात आले आहे. याआधी हे विधेयक 2017 मध्ये संसदेत सादर करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी या विधेयकाला मंजूरी मिळाली नव्हती. 

दरम्यान, लोकसभेत रस्ते अपघातासंदर्भात काही आकडे सादर करण्यात आले. त्यावरुन असे समजते की भारतात रस्ते असुरक्षित आहेत. 2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू होतो. तर देशात वर्षाला 1,47,913 लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

याशिवाय, राज्यानुसार पाहिले तर भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात रस्ते अपघात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आणि चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, भारतातील लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात एकही रस्ते अपघात झाला नाही. तर अंदमान-निकोबार, दमन-दीव, नागालँड आणि दादर नगर हवेली यासारख्या केंद्रशासित प्रदेशात रस्ते अपघातात 50 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.  

दरम्यान, रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन(संशोधन) विधेयकात अनेक गाइडलाइन्स घातल्या आहेत. या विधेयकात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास चालकाला मोठा दंड भरावा लागणार आहे. बेदरकारपणे गाडी चालवणे किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, सीट बेल्ट न बांधणे आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा