शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

परिवारातील आग कशी विझवायची? भाजप आणि संघातील वादाचा नवा अध्याय संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:14 IST

BJP Vs RSS: भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही, असे नड्डा बोललेले, तेवढ्यावरच हे थांबलेले नाही... संघपरिवाराला मतभेद नवीन नाहीत; पण यंदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुरू झालेला वादाचा अध्याय अद्याप संपलेला नाही.

- हरीष गुप्ता,

नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीयंदाच्या मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि त्याला पितृस्थानी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सुरू झालेला वादाचा अध्याय अद्याप संपलेला नाही. संघपरिवाराला असे मतभेद नवीन नाहीत. यापूर्वी वसंतराव ओक, बलराज मधोक, लालकृष्ण अडवाणी इतकेच नव्हे, तर अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरूनही मतभेद झालेले होते; परंतु त्यावेळी हिंदी सिनेमाचा शेवट जसा गोड होतो तसे ते वाद मिटले आणि अर्थातच संघाची त्यात सरशी झाली होती; परंतु यावेळी भाजपचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा १८ मे २०२४ रोजी काहीसे अकल्पनीय बोलले.

लोकसभा निवडणुका रंगात आलेल्या असताना ते म्हणाले होते, 'भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. कारण आता पक्ष मोठा झाला असून, आपला कारभार पाहू शकतो.' एवढ्यावर ते थांबले नव्हते. 'प्रत्येकाला त्याची त्याची कर्तव्ये आणि भूमिका आहेत. संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना असून, भाजप राजकीय संघटन आहे. हा प्रश्न गरजेचा नाही. नड्डा यांच्या उद्‌गारांमुळे राजकीय निरीक्षकांना धक्का बसला. परिवारातही प्रतिक्रिया उमटली; परंतु उघडपणे कोणी बोलायला तयार नव्हते; मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजप नेतृत्वाला धक्का देणारा लागला. ३०३ वरून पक्षाचे संख्याबळ २४० वर आले. पक्षाने बहुमत गमावले. एनडीएला मात्र बहुमत मिळाले.

भाजपचे नेतृत्व सुधारणा करून घेईल असे वाटले होते; परंतु तसे काहीच घडले नाही. शेवटी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांजराच्या गळ्यात दोन महिन्यांनंतर का होईना घंटा बांधायचे ठरवले. १८ जुलैला रांचीत त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले, 'स्वयंविकास करत असताना एखाद्या व्यक्तीला सुपरमॅन किंवा परमेश्वर आणि नंतर विश्वरूप व्हावे, असे वाटत असते. भागवत यांनी कोणाचे नाव घेतले नाही; परंतु ते कोणाला उद्देशून बोलत होते ते सगळ्यांनाच कळले.

सुरेश सोनी यांचे महत्त्वराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवस चालणाऱ्या वार्षिक समन्वय समितीची बैठक ३१ ऑगस्टला केरळमध्ये सुरू होत असून, सर्वांच्या नजरा आता या बैठकीकडे लागल्या आहेत. भाजपसह संघाच्या सर्व ३६ संघटनांच्या कामगिरीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. नड्डा आणि काही ज्येष्ठ मंत्री केरळमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने संघ आणि भाजपतील धुमसणाऱ्या वादावर काहीतरी मार्ग निघेल असे अंतर्गत सूत्रांना वाटते. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सलोख्याच्या गोष्टी सुरू केलेल्या आहेतच. संघ नसेल तर भाजप नवी काँग्रेस होईल हेही त्यांना कळून चुकले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून संघाने आपले राजकीय स्वयंसेवक काढून घेतले तर भाजपमध्ये इतर पक्षांतून फुटून आलेले लोक तेवढे राहतील. चिंताग्रस्त भाजप मंत्रिमंडळ तयार करण्यात गुंतलेला असताना संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश सोनी यांचा दरवाजा ठोठावण्यात आला. संघात सोनी यांच्याकडे आदराने पाहिले जाते. त्यांनी गुजरातमध्ये काम केले असून, मोदी यांना गुजरातमधून दिल्लीला आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

प्रतिनिधीमार्फत किंवा अन्य प्रकारे सरकार चालवण्यात संघाला अजिबात रस नाही असे संघटनेच्या नेतृत्वाने भाजपला स्पष्ट केले आहे. नवा पक्षप्रमुख नेमला जाईल तेव्हा संघाचा सल्ला घेतला तर बरे, एवढीच अपेक्षा आहे हा अध्यक्ष संघाचा समर्पित स्वयंसेवक असावा, असेही पक्षाला कळवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत, हे पक्षाने संघाच्या निदर्शनास आणून दिले. कार्यकारी अध्यक्ष नेमावा अशीही कल्पना पुढे आली. काही नावांवर चर्चाही झाली. त्यात महाराष्ट्रातून आलेले भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि शिवराजसिंह चौहान यांचा उल्लेख होता; परंतु भाजप नेतृत्वाने जानेवारी २०२५ पर्यंत नड्डा यांनाच अध्यक्ष ठेवावे, अशी सूचना केली. भाजपशी समन्वय ठेवण्याचे काम संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे व सह सरचिटणीस अरुणकुमार हे करत असले तरीही सध्याचा पेचप्रसंग मात्र सुरेश सोनी यांच्यावर सोपविण्यात आला आहे.

खट्टर यांचा हरयाणात हस्तक्षेपकरनालमधून लोकसभेवर निवडून आल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. अर्थातच त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडले; परंतु राज्याच्या कारभारात ढवळाढवळ त्यांनी थांबवलेली नाही. चंडिगडमधील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातच ते तळ ठोकून आहेत. त्यांचे उत्तराधिकारी नायब सिंह सैनी यांना कारभार करताना खट्टर यांचे मार्गदर्शन लागते असे सांगण्यात आले. खट्टर हे मोदींचे निष्ठावंत असून, पूर्णवेळ संघस्वयंसेवक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसारच खट्टर यांचे दुसरे निष्ठावंत मोहनलाल बदोली यांना हरियाणा भाजपचे अध्यक्ष करण्यात आले. सोनीपतमधून बदोली लोकसभा निवडणूक लढले; परंतु त्यांना अपयश आले. ते भाजपचे आमदार आहेत. जातीने ब्राह्मण असल्याने राज्यातील विगर जाट मते त्यांच्यामुळे पक्षाकडे वळतील अशी आशा भाजपला आहे. खट्टर पंजाबी असून, सैनी इतर मागासवर्गीय आहेत. जाट मते काँग्रेस, लोकदल आणि जेजेपी अशा तीन पक्षांत विभागली जातील अशी भाजपची अटकळ असून, तिसऱ्यांदा यश मिळवायचे तर पक्षाला बरेच झगडावे लागेल, लोकसभा निवडणुकीतही पक्षाला जोरदार फटका बसला. १० पैकी पाच जागा पक्षाने गमावल्या. मतांची टक्केवारीही घसरली. डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत असल्याने अँटी इन्कम्बन्सीचा त्रास होऊ नये म्हणून पक्षाने त्यांना हटवले असताना राज्यातील पक्षाचा चेहरा म्हणून अजूनही खट्टर यांनाच का समोर ठेवले जाते, याचे अनेकांना आश्चर्य वाटते.

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ