शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

11 डिसेंबरनंतर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार? राहुल गांधींचं वजन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 12:47 PM

राजस्थानसोबतच मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसने भाजपाला धक्का दिला, तर राहुल गांधी यांना नवं बळ मिळेल.

ठळक मुद्देराजस्थान तर भाजपाच्या हातून जाईलच, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला लक्षणीय यश मिळेल, असं एक्झिट पोल सांगताहेत. एक्झिट पोल खरे ठरल्यास 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार, हा प्रश्न भाजपाच्या चिंता वाढवणारा आहे. भाजपाचा पराभव झाल्यास अयोध्येतील राम मंदिराचा शंख फुंकला जाऊ शकतो, हिंदुत्वाचा नारा दिला जाऊ शकतो

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्याची शक्यता बऱ्याच एक्झिट पोल्सनी वर्तवली आहे. राजस्थान तर भाजपाच्या हातून जाईलच, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला लक्षणीय यश मिळेल, असं आकडे सांगताहेत. हे अंदाज ११ डिसेंबरला खरे ठरले, तर त्याचे देशाच्या राजकारणावर कसे परिणाम होतील, यावर एक दृष्टिक्षेप... 

१. राहुल गांधींचं वजन वाढणार!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक निवडणुका लढवल्या, पण त्यांच्या पदरी निराशाच अधिक पडली आहे. मात्र, हे एक्झिट पोल राहुल गांधींसाठी आणि काँग्रेससाठी दिलासादायक आहेत. राजस्थानसोबतच मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसने भाजपाला धक्का दिला, तर राहुल गांधी यांना नवं बळ मिळेल. २०१९साठी विरोधकांच्या ऐक्याचा जो प्रयत्न काँग्रेस करतंय, त्यात राहुल यांची स्वीकारार्हता वाढेल. स्वाभाविकच, भाजपासाठी ते मोठं आव्हान ठरेल. 

२. मोदींच्या करिष्म्याचं काय होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'ब्रॅण्ड' म्हणूनच पाहिलं जातं. त्यांच्या करिष्म्याच्या जोरावर भाजपाने अनेक निवडणुका फिरवल्यात. लोकसभेच्या या सेमी फायनलमध्येही त्यांनी झंझावाती प्रचार केला. २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार आणायचं असेल तर या राज्यांमध्ये कमळ फुलवा, असाच प्रचार भाजपाने केला होता. आता एवढं होऊनही काँग्रेसनं बाजी मारली, तर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार, हा प्रश्न भाजपाच्या चिंता वाढवणारा आहे.   ३. वसुंधरांची 'राजे'शाही संपेल!

राजस्थानमध्ये भाजपाचं कमळ फुलेल, असं एकाही एक्झिट पोलचे आकडे सांगत नाहीत. जनतेनं खरोखरच काँग्रेसला हात दिला, तर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राजेशाही संपुष्टात येईल आणि भाजपा त्यांचा हात सोडू शकेल. राष्ट्रीय नेतृत्वावर दबाव आणून राजे यांनी आपलंच घोडं पुढे दामटलं होतं. परंतु, मतदारांनीच त्यांना नाकारल्यास गजेंद्र सिंह शेखावत किंवा राज्यवर्धन राठोड हे दोन पर्याय भाजपाकडे आहेत. त्यांना प्रदेश नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते.  

४. प्रादेशिक पक्षांना धक्का

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये प्रादेशिक पक्ष निष्प्रभ ठरत असल्याचं एक्झिट पोलमधून दिसतंय. याचाच अर्थ, मतदार आता राष्ट्रीय पक्षांना पसंती देताना दिसताहेत. हा बदलता कल देशाच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. 

५. महाआघाडीचा प्रयोग फसेल?

तेलंगणा विधानसभेत पुन्हा टीआरएस सत्ता स्थापन करेल, असं एक्झिट पोल सांगतात. म्हणजेच, काँग्रेसच्या महाआघाडीला केसीआर भारी पडताना दिसताहेत. याचा परिणाम २०१९ साठी होऊ घातलेल्या महाआघाडीच्या भवितव्यावर होऊ शकतो. तेलंगणामध्ये भाजपा शर्यतीत नव्हतीच. उलट, टीआरएसचा विजय त्यांच्यासाठी आशादायीच ठरू शकेल.

६. संसदेत विरोधक होणार आक्रमक

भाजपा हरणं म्हणजे काँग्रेस आणि सर्वच विरोधकांना ऑक्सिजन मिळण्यासारखं आहे. दोन राज्यांमध्ये जरी सत्तांतर झालं तरी विरोधकांना नवचैतन्य मिळेल आणि हिवाळी अधिवेशनात ते मोदी सरकारला घेरण्याचा नव्या जोमाने प्रयत्न करतील. 

७. राम मंदिरच भाजपाचा आधार?

आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्यात आणि यापुढेही लढवू, असं भाजपा नेते म्हणत असले तरी, या 'मिनी लोकसभा' निवडणुकीत धक्का बसल्यास त्यांना रणनीती बदलावी लागू शकते. अशावेळी अयोध्येतील राम मंदिराचा शंख फुंकला जाऊ शकतो, हिंदुत्वाचा नारा दिला जाऊ शकतो, असं जाणकारांना वाटतंय. 

८. काँग्रेसच्या 'हाता'तून सुटतोय ईशान्य भारत

ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये काँग्रेसचा दबादबा होता. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिथे केलेल्या कामाचा फायदा भाजपाला होत असून मिझोरमही काँग्रेसच्या हातून जाताना दिसतंय. त्यावर त्यांना चिंतन करावं लागेल.

टॅग्स :Assembly Election 2018 Resultविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018