शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

11 डिसेंबरनंतर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार? राहुल गांधींचं वजन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 12:48 IST

राजस्थानसोबतच मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसने भाजपाला धक्का दिला, तर राहुल गांधी यांना नवं बळ मिळेल.

ठळक मुद्देराजस्थान तर भाजपाच्या हातून जाईलच, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला लक्षणीय यश मिळेल, असं एक्झिट पोल सांगताहेत. एक्झिट पोल खरे ठरल्यास 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार, हा प्रश्न भाजपाच्या चिंता वाढवणारा आहे. भाजपाचा पराभव झाल्यास अयोध्येतील राम मंदिराचा शंख फुंकला जाऊ शकतो, हिंदुत्वाचा नारा दिला जाऊ शकतो

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्याची शक्यता बऱ्याच एक्झिट पोल्सनी वर्तवली आहे. राजस्थान तर भाजपाच्या हातून जाईलच, पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसला लक्षणीय यश मिळेल, असं आकडे सांगताहेत. हे अंदाज ११ डिसेंबरला खरे ठरले, तर त्याचे देशाच्या राजकारणावर कसे परिणाम होतील, यावर एक दृष्टिक्षेप... 

१. राहुल गांधींचं वजन वाढणार!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक निवडणुका लढवल्या, पण त्यांच्या पदरी निराशाच अधिक पडली आहे. मात्र, हे एक्झिट पोल राहुल गांधींसाठी आणि काँग्रेससाठी दिलासादायक आहेत. राजस्थानसोबतच मध्य प्रदेश किंवा छत्तीसगडमध्ये जर काँग्रेसने भाजपाला धक्का दिला, तर राहुल गांधी यांना नवं बळ मिळेल. २०१९साठी विरोधकांच्या ऐक्याचा जो प्रयत्न काँग्रेस करतंय, त्यात राहुल यांची स्वीकारार्हता वाढेल. स्वाभाविकच, भाजपासाठी ते मोठं आव्हान ठरेल. 

२. मोदींच्या करिष्म्याचं काय होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 'ब्रॅण्ड' म्हणूनच पाहिलं जातं. त्यांच्या करिष्म्याच्या जोरावर भाजपाने अनेक निवडणुका फिरवल्यात. लोकसभेच्या या सेमी फायनलमध्येही त्यांनी झंझावाती प्रचार केला. २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार आणायचं असेल तर या राज्यांमध्ये कमळ फुलवा, असाच प्रचार भाजपाने केला होता. आता एवढं होऊनही काँग्रेसनं बाजी मारली, तर 'ब्रॅण्ड मोदी'चं काय होणार, हा प्रश्न भाजपाच्या चिंता वाढवणारा आहे.   ३. वसुंधरांची 'राजे'शाही संपेल!

राजस्थानमध्ये भाजपाचं कमळ फुलेल, असं एकाही एक्झिट पोलचे आकडे सांगत नाहीत. जनतेनं खरोखरच काँग्रेसला हात दिला, तर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राजेशाही संपुष्टात येईल आणि भाजपा त्यांचा हात सोडू शकेल. राष्ट्रीय नेतृत्वावर दबाव आणून राजे यांनी आपलंच घोडं पुढे दामटलं होतं. परंतु, मतदारांनीच त्यांना नाकारल्यास गजेंद्र सिंह शेखावत किंवा राज्यवर्धन राठोड हे दोन पर्याय भाजपाकडे आहेत. त्यांना प्रदेश नेतृत्वाची संधी दिली जाऊ शकते.  

४. प्रादेशिक पक्षांना धक्का

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये प्रादेशिक पक्ष निष्प्रभ ठरत असल्याचं एक्झिट पोलमधून दिसतंय. याचाच अर्थ, मतदार आता राष्ट्रीय पक्षांना पसंती देताना दिसताहेत. हा बदलता कल देशाच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. 

५. महाआघाडीचा प्रयोग फसेल?

तेलंगणा विधानसभेत पुन्हा टीआरएस सत्ता स्थापन करेल, असं एक्झिट पोल सांगतात. म्हणजेच, काँग्रेसच्या महाआघाडीला केसीआर भारी पडताना दिसताहेत. याचा परिणाम २०१९ साठी होऊ घातलेल्या महाआघाडीच्या भवितव्यावर होऊ शकतो. तेलंगणामध्ये भाजपा शर्यतीत नव्हतीच. उलट, टीआरएसचा विजय त्यांच्यासाठी आशादायीच ठरू शकेल.

६. संसदेत विरोधक होणार आक्रमक

भाजपा हरणं म्हणजे काँग्रेस आणि सर्वच विरोधकांना ऑक्सिजन मिळण्यासारखं आहे. दोन राज्यांमध्ये जरी सत्तांतर झालं तरी विरोधकांना नवचैतन्य मिळेल आणि हिवाळी अधिवेशनात ते मोदी सरकारला घेरण्याचा नव्या जोमाने प्रयत्न करतील. 

७. राम मंदिरच भाजपाचा आधार?

आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्यात आणि यापुढेही लढवू, असं भाजपा नेते म्हणत असले तरी, या 'मिनी लोकसभा' निवडणुकीत धक्का बसल्यास त्यांना रणनीती बदलावी लागू शकते. अशावेळी अयोध्येतील राम मंदिराचा शंख फुंकला जाऊ शकतो, हिंदुत्वाचा नारा दिला जाऊ शकतो, असं जाणकारांना वाटतंय. 

८. काँग्रेसच्या 'हाता'तून सुटतोय ईशान्य भारत

ईशान्य भारतातील सात राज्यांमध्ये काँग्रेसचा दबादबा होता. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिथे केलेल्या कामाचा फायदा भाजपाला होत असून मिझोरमही काँग्रेसच्या हातून जाताना दिसतंय. त्यावर त्यांना चिंतन करावं लागेल.

टॅग्स :Assembly Election 2018 Resultविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Chhattisgarh Assembly Election 2018छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018