शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यानं भारताचं किती होतं नुकसान? 'इतका' मोठा बसतो फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 12:35 IST

बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली -  जम्मू काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्ताननेभारतासाठी स्वतःची हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्ताननं ही हवाई हद्द 31 ऑगस्टपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भारतासाठी बंद केली आहे. परंतु पाकिस्तान ही हवाई हद्द भारतासाठी कायमस्वरूपी बंद करण्याच्या विचारात आहे. 

बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हवाई हद्द खुली करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. बालकोट एअरस्ट्राईकनंतर तब्बल 138 दिवस पाकिस्तानची एअरस्पेस बंद असल्याने भारताला कोट्यावधीचे नुकसान सहन करावं लागलं होतं. त्यामुळे पाकिस्तानने पुन्हा घेतलेल्या हवाई हद्द बंद करण्याच्या निर्णयामुळे दोन्ही देशांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. 

मागील वेळी किती झालं होतं नुकसान?138 दिवस पाकिस्तानने एअरस्पेस बंद ठेवल्याने पाकिस्तानला 5 कोटी डॉलर(360 कोटी) रुपयांचे नुकसान झाले होते. हे नुकसान ओवरफ्लाइंग चार्जच्या स्वरूपात झाले होते. फक्त एकट्या एअर इंडियाला 560 कोटी रूपये जास्त खर्च करावे लागले होते. त्याशिवाय इंडिगो, स्पाइसजेट, गोएअर यांना 60 कोटींचे नुकसान सहन करावं लागलं होतं. 

दिवसाला 400 उड्डाणांवर होणार परिणामबालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतासाठी एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रतिदिन 400 विमान उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला होता. बहुतांश विमानांनी ओमन मार्गे उड्डाण घेतलं होतं. तर इराणमार्गे 100 पेक्षा अधिक विमान वाहतूक सुरू होती. ओमन मार्गे उड्डाण घेणाऱ्या भारतीय विमानांना लंडन ते सिंगापूरदरम्यान 451 किमी अंतर वाढलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानने एअरस्पेस बंद केल्याने हीच परिस्थिती समोर येणार आहे. 

पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्याने भारतातून दक्षिण आशिया आणि यूरोपच्या विविध भागात जाण्या-येण्यासाठी लांबचा पल्ला घ्यावा लागतो. या विमानांना पाकिस्तानऐवजी मुंबई-अरबी समुद्र-मस्कट खाडीमार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे पूर्व पट्ट्यातून विमान उड्डाण घेणाऱ्यांना अमेरिकेला जाण्यासाठीचा वेळ वाढला जातो आणि इंधन भरण्यासाठीही पूर्वीपेक्षा अधिक ठिकाणी स्टॉप घ्यावा लागतो. त्यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढतो. 

पाकिस्तानच्या या निर्णयाचा सामना करण्यासाठी भारत सज्ज एअर इंडियाच्या पायलटने सांगितले की, आम्ही 5 ऑगस्टला ज्या दिवशी कलम 370 रद्द केला तेव्हापासून आम्ही तयार आहोत. आम्ही मागीलवेळी केलेली रणनीती वापरणार आहे. यासाठी आम्हाला अतिरिक्त खर्च उचलावा लागणार आहे. मात्र तेल कंपन्यांना त्यांची थकबाकी न मिळाल्याने मागील आठवड्यापासून 6 विमानतळांवर एअर इंडियाला इंधन देणं बंद केलं आहे. इतरही अनेक विमान कंपन्यांनी अतिरिक्त खर्च उचलण्यासाठी तयारी आधीच करून ठेवली होती. 

  

टॅग्स :IndiaभारतIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानAir Indiaएअर इंडिया