सोलापुरात कचरा निघतो किती आयुक्तांना पडला प्रश्न: सर्वेक्षणाची गरज स्वच्छतेची ऐशीतैशी:भाग?1
By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:14+5:302015-08-28T23:37:14+5:30
सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प्रश्न निकाली न निघाल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.

सोलापुरात कचरा निघतो किती आयुक्तांना पडला प्रश्न: सर्वेक्षणाची गरज स्वच्छतेची ऐशीतैशी:भाग?1
स लापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प्रश्न निकाली न निघाल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. समीक्षाने काम बंद केल्यावर जानेवारी 2015 पासून महापालिकेने पूर्वीप्रमाणेच स्वबळावर कचरा उचलण्याचा निर्णय घेतला. पण या कामाचे नियोजन अद्याप जमले नाही. विभागनिहाय आठ ठेकेदार नेमून कचरा उचलला जात आहे. वजनावर ठेकेदारांना पैसे दिले जात आहेत. लाखो रुपये खचरूनही शहरातील घाण हटलेली नाही. पावसाळ्याचे दिवस व रस्त्यावर कचरा साठल्याने रोगराईचा धोका वाढला आहे. त्यामुळे आयुक्त काळम-पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले असले तरी त्यांनाही नेमकी माहिती दिली जात नाही. शहरात दररोज 350 टन कचरा निघतो व त्यापैकी 250 टन कचरा उचलला जातो असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दररोज उरलेल्या 100 टन कचर्याचे काय होते असा प्रश्न खुद्द आयुक्तांना पडला आहे. असे झाले तर आत्तापर्यंत सर्वत्र कचरा साठून राहायला हवा होता. कचरा नेमका निघतो किती यावर अभ्यास करण्यासाठी कचर्यापासून वीज निर्मिती करणार्या ठेकेदाराला सुचित करण्यात आले आहे.आरोग्य विभागाच्या अधिकार्यांचे व्यवस्थित परीक्षण होत नसल्याने कचरा गोळा करण्यात गडबडी होत आहेत. घंटागाड्या आहेत पण पूर्वीसारखे त्यांच्याकडून काम होत नसल्याचे दिसून आले आहे. आयुक्तांनी मायक्रो प्लॅनिंग करूनही ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या धावत नाहीत. ठराविक ठिकाणी या गाड्या जात असल्याचे दिसून आले आहे. ठेकेदारांची बनवाबनवीआठ ठेकेदारांमार्फत शहरातील कचरा उचलला जातो. ठेकेदार जेसीबीद्वारे कचरा उचलतात. यामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. कचर्यात माती जाते व पर्यायाने कचर्याचे वजन वाढते. काट्यावर वजन करण्यासाठी गाडी नेण्यापूर्वी ठेकेदार गाडीत पाणी ओतत असल्याचा प्रकार उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी उघडकीस आणला आहे.