शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जे कोर्टाचं देखील काम नाही, ते राज्यपालांनी कसं काय केलं?; ठाकरे गटाच्या वकिलांनी ठेवलं वर्मावर बोट!

By मोरेश्वर येरम | Updated: February 28, 2023 12:07 IST

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस ठाकरे गटाकडून युक्तिवाद केल्यानंतर आजही ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत.

नवी दिल्ली-

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस ठाकरे गटाकडून युक्तिवाद केल्यानंतर आजही ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. आजची सुनावणी १५ मिनिटं उशीरा सुरू झाली आणि सुरुवातीलाच सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरे गटाच्या वकिलांनी वेळेत सुनावणी पूर्ण करण्याची सूचना दिली. यावरुन सुप्रीम कोर्टाला याप्रकरणी दोन्ही बाजूची सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करण्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. 

ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी आपण फक्त ४५ मिनिटांत युक्तिवाद पूर्ण करू असं आश्वासन दिलं आणि पहिल्याच मुद्द्यावरुन वर्मावर बोट ठेवलं. "ज्या गोष्टींवर सुप्रीम कोर्टाचा देखील हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं आपण म्हणतोय. स्वायत्त संस्था आणि विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार असल्याचं आपण म्हणतोय. मग जे कोर्टाचं देखील काम नाही ते राज्यपालांनी कसं काय केलं? शिवसेनेत फूट पडलीय हे राज्यपालांनी कसं काय ठरवलं आणि बहुमत चाचणीसाठी विशेष अधिवेशन कसं काय बोलावलं?", असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. 

एखाद्या पक्षात फूट पडलीय किंवा एकनाथ शिंदे यांचाच खरा पक्ष असल्याचा निकालच जणू राज्यपालांनी आपल्या कृतीतून दिला होता, असं अभिषूक मनु सिंघवी कोर्टात म्हणाले. जर सरकार स्थिर नाही हे राज्यपालांनी कसं ठरवलं? शिंदेंकडचे आमदार हेच शिवसेना असल्याचं मानून त्यांनी सरकारला शपथ कशी काय दिली? तसंच ज्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे अशा आमदारांना शपथ देऊन भविष्यात संबंधित आमदार पात्र ठरणार आहेत असा निकालच त्यांनी देऊन टाकला का?, असा सवाल उपस्थित करत अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. 

...तर सगळे प्रश्न सुटतीलअभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद ऐकून घेत असताना सरन्यायाधीशांनी आता घड्याळ्याचे काट उलटे कसे फिरवणार? असं विचारलं असता सिंघवी यांनी 'सुप्रीम' तोडगा सांगितला. "विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, बहुमत चाचणी आणि इतर मुद्द्यांवर आपण हस्तक्षेप करणं शक्य नाही असं तुमचं म्हणणं असेल तर राज्यपालांचे जे पत्र आहे तेच रद्दबातल ठरवलं की सारे मुद्दे निकाली निघतील. राज्यपालांनी त्यांच्या अधिकारांच्या पलिकडे जाऊन निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयाचं पत्र रद्द ठरवणं कोर्टाच्या हातात आहे. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठरावासाठीचं जारी केलेलं पत्रकच रद्दबातल ठरवलं तर सगळे प्रश्न सुटतील", असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय