शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

"एखादा मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरं जाणार नाही असं कसं म्हणू शकतो?"; शिंदे गटाच्या वकिलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:33 IST

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून शिंदे गटाकडून वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत.

नवी दिल्ली-

राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असून शिंदे गटाकडून वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करत आहेत. ठाकरे गटाकडून केल्या गेलेल्या युक्तिवादाचे मुद्दे नीरज किशन कौल खोडून काढत आहेत. यावेळी कौल यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. एखादा मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरं जाणार नाही असं कसं म्हणू शकतो? कारण बहुमत चाचणी हीच आपल्या लोकशाहीची लिटमस टेस्ट आहे असं वेळोवेळी न्यायालयानं म्हटलं आहे, असं नीरज किशन कौल म्हणाले. 

राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात दिलेल्या आदेशावरुन ठाकरे गटाकडून जोरदार विरोध युक्तिवादात करण्यात आला होता. राज्यपालांनी दिलेलं पत्रच रद्दबातल ठरवलं की सर्व मुद्दे सुटतील अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. त्यावरील प्रतिवादात नीरज किशन कौल यांनी राज्यपालांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती हे सरन्यायाधीशांना पटवून दिलं. 

"सरकारनं बहुमत गमावल्याची पत्र राज्यपालांना मिळाली होती. तसंच तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची भेट घेऊन सरकारनं बहुमत गमावल्याचं पत्र दिलं होतं. मग त्यावेळी राज्यपालांनी नेमकं काय करायला हवं होतं? सरकारला सभागृहात बहुमत आहे की नाही हेच त्यांना पडताळून पाहायचं होतं. सरकार विरोधातील पत्र आणि दावे पाहता त्यांनी बहुमत चाचणीची सूचना दिली. पण एखादा मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरं जाणार नाही असं कसं म्हणू शकतो? कारण बहुमत चाचणी हीच आपल्या लोकशाहीची लिटमस टेस्ट आहे असं वेळोवेळी न्यायालयानं म्हटलं आहे", असा जोरदार युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी कोर्टात केला आहे. 

माननीय कोर्ट म्हणतं की बहुमत चाचणी ही विधीमंडळाच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. पण ती होऊच शकली नाही. कारण ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जून रोजी शिंदे आणि फडणवीस यांनी युती म्हणून राज्यपालांशी संपर्क साधला, असंही नीरज किशन कौल म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय