शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास हॉटेलच देणार नुकसान भरपाई: सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 09:08 IST

दिल्लीचे हॉटेल ताजमहालमधून 1998 मध्ये गाडी चोरीला गेली होती.

नवी दिल्ली : गाडी चोरी होण्याच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. जर हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून गाडी चोरीला गेल्यास त्याची नुकसानभरपाई हॉटेलला द्यावी लागणार असल्याचे निकालात म्हटले आहे. हा निर्णय न्यायालयाने ताज हॉटेल विरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या प्रकरणात दिला आहे. 

जर एखादा ग्राहक हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या गाडीची चावी देत असेल आणि पार्किंगमध्ये गाडीचे संरक्षण हॉटेलच करणार आहे. यावेळी गाडी चोरी झाल्यास किंवा तिचे नुकसान झाल्यास हॉटेलच नुकसानभरपाई देणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

दिल्लीचे हॉटेल ताजमहालमधून 1998 मध्ये गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणाचा निकाल आता आला आहे. मारुतीची झेन कार चोरीला गेली होती. न्यायालयाने तब्बल 20 वर्षांनी निकाल देत ताज हॉटेलला 2.8 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ग्राहकाने ज्या स्थितीत वाहन दिले आहे त्या स्थितीत त्याला ते परत मिळायला हवे. पार्किंग मोफत दिले होते, ही सबब चालणार नाही. जर ते पार्किंग हॉटेल देत असेल तर त्या वाहनाची जबाबदारी हॉटेल प्रशासनाची राहील.

हॉटेलवाले ग्राहकांकडून रूम भाडे, एन्ट्री फी, फूड असे अनेक बाबतीत पैसे आकारतात. यामुळे कार चोरीची भरपाई हॉटेललाच द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.  

टॅग्स :carकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय