शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच रुग्णालयांना आगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 06:38 IST

गुजरातमध्ये चार महिन्यांत हॉस्पिटल्समध्ये आगीच्या ६ गंंभीर दुर्घटना

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : भंडाऱा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा जीव घेतलेल्या आगीने रुग्णालयाच्या प्रशासकांच्या निष्काळजीपणाला उघडे पाडले आहे. रुग्णालयांत लागणाऱ्या आगी या सर्वोच्च न्यायालय आणि गृहमंत्रालयाने दिलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लागत असून त्याची किमत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मोजावी लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर, २०२० रोजी दिलेल्या आपल्या आदेशात रुग्णालयांत लागणाऱ्या आगींसाठी स्पष्टपणे रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे. न्यायालयाने सगळ्या राज्यांना प्रत्येक रुग्णालयात फायर सिक्युरिटी ऑडिट करून रुग्णालयांना अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आदेश दिले. असे न केल्यास रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाईचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. या आधी गृह मंत्रालयाने ३० नोव्हेंबर रोजी देशात सगळी रुग्णालये आणि नर्सिंग होम्समध्ये आगीपासून सुरक्षेचे उपाय पाळण्याचे दिशा निर्देश दिले होते.भंडाऱ्यातील घटनेतून हे स्पष्ट झाले की, रुग्णालय प्रशासनाने केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले असते तर १० मुलांचा जीव वाचला असता. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अँड पब्लिक हेल्थच्या ताज्या अहवालानुसार गेल्या १० वर्षांत देशात रुग्णालयांत आगीच्या ३३ मोठ्या घटना घडल्या. गुजरातमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान रुग्णालयांत आगीच्या सहा घटना घडल्या व त्यात अनेकांचा मृत्यू झाला. अहमदाबादेत श्रेय रुग्णालयात ८ आणि राजकोटमध्ये उदय शिवनंद कोविड रुग्णालयात आग लागून ५ जणांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकांना अटक झाली होती. ऑगस्ट महिन्यात आंध्र प्रदेशमध्ये विजयवाड़ात कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीत ११ जण मरण पावले होते. या घटनेत व्यवस्थापनातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली होती.

रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या प्रमुख घटनाn ९ डिसेंबर, २०११ - कोलकातात एएमआरआय रुग्णालयात ९० पेक्षा जास्त मृत्यू.n १३ जानेवारी, २०१३ - बिकानेरमध्ये पी.बी.एम. रुग्णालयात तीन रुग्ण गंभीररित्या भाजले.n १६ ऑक्टोबर, २०१५ - ओदिशातील कटकमध्ये आचार्य हरिहर रिजनल कॅन्सर सेंटरच्या शस्रक्रिया विभागात आगीत एक ठार ८० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांत हलवावे लागले.n १८ ऑक्टोबर, २०१६ - भुवनेश्वरमध्ये एसयूएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू.n १६ जुलै, २०१७ – लखनौतील केजीएमयूमध्ये २५० रुग्णांच्या जीविताला होता धोका. त्यांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयांत हलवले गेले.n २० डिसेंबर, २०१८ - मुंबईत ईएसआयसीत आठ जणांचा मृत्यू. १४० पेक्षा जास्त जखमी.n २३ जानेवारी, २०१९ - छत्तीसगडमध्ये छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सन्मध्ये आग लागून तीन रुग्ण गंभीररित्या भाजले आणि ४० मुलांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले गेले.n ६ ऑगस्ट, २०२० - अहमदाबादेत श्रेया रुग्णालयात ८ रुग्णांचा मृत्यू.n २७ नोव्हेंबर, २०२० - राजकोटमध्ये उदय शिवानंद रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू. पाच महिन्यांत गुजरातमध्ये रुग्णालयात आगीच्या सात घटना घडल्या.

 

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलBhandara Fireभंडारा आग