शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच रुग्णालयांना आगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 06:38 IST

गुजरातमध्ये चार महिन्यांत हॉस्पिटल्समध्ये आगीच्या ६ गंंभीर दुर्घटना

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : भंडाऱा जिल्हा सामान्य रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा जीव घेतलेल्या आगीने रुग्णालयाच्या प्रशासकांच्या निष्काळजीपणाला उघडे पाडले आहे. रुग्णालयांत लागणाऱ्या आगी या सर्वोच्च न्यायालय आणि गृहमंत्रालयाने दिलेले आदेश आणि मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लागत असून त्याची किमत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना मोजावी लागत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १८ डिसेंबर, २०२० रोजी दिलेल्या आपल्या आदेशात रुग्णालयांत लागणाऱ्या आगींसाठी स्पष्टपणे रुग्णालय प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे. न्यायालयाने सगळ्या राज्यांना प्रत्येक रुग्णालयात फायर सिक्युरिटी ऑडिट करून रुग्णालयांना अग्नीशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचे आदेश दिले. असे न केल्यास रुग्णालय व्यवस्थापनावर कठोर कारवाईचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. या आधी गृह मंत्रालयाने ३० नोव्हेंबर रोजी देशात सगळी रुग्णालये आणि नर्सिंग होम्समध्ये आगीपासून सुरक्षेचे उपाय पाळण्याचे दिशा निर्देश दिले होते.भंडाऱ्यातील घटनेतून हे स्पष्ट झाले की, रुग्णालय प्रशासनाने केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले असते तर १० मुलांचा जीव वाचला असता. इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसीन अँड पब्लिक हेल्थच्या ताज्या अहवालानुसार गेल्या १० वर्षांत देशात रुग्णालयांत आगीच्या ३३ मोठ्या घटना घडल्या. गुजरातमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान रुग्णालयांत आगीच्या सहा घटना घडल्या व त्यात अनेकांचा मृत्यू झाला. अहमदाबादेत श्रेय रुग्णालयात ८ आणि राजकोटमध्ये उदय शिवनंद कोविड रुग्णालयात आग लागून ५ जणांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकांना अटक झाली होती. ऑगस्ट महिन्यात आंध्र प्रदेशमध्ये विजयवाड़ात कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीत ११ जण मरण पावले होते. या घटनेत व्यवस्थापनातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक झाली होती.

रुग्णालयांना लागलेल्या आगीच्या प्रमुख घटनाn ९ डिसेंबर, २०११ - कोलकातात एएमआरआय रुग्णालयात ९० पेक्षा जास्त मृत्यू.n १३ जानेवारी, २०१३ - बिकानेरमध्ये पी.बी.एम. रुग्णालयात तीन रुग्ण गंभीररित्या भाजले.n १६ ऑक्टोबर, २०१५ - ओदिशातील कटकमध्ये आचार्य हरिहर रिजनल कॅन्सर सेंटरच्या शस्रक्रिया विभागात आगीत एक ठार ८० रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांत हलवावे लागले.n १८ ऑक्टोबर, २०१६ - भुवनेश्वरमध्ये एसयूएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू.n १६ जुलै, २०१७ – लखनौतील केजीएमयूमध्ये २५० रुग्णांच्या जीविताला होता धोका. त्यांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयांत हलवले गेले.n २० डिसेंबर, २०१८ - मुंबईत ईएसआयसीत आठ जणांचा मृत्यू. १४० पेक्षा जास्त जखमी.n २३ जानेवारी, २०१९ - छत्तीसगडमध्ये छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सन्मध्ये आग लागून तीन रुग्ण गंभीररित्या भाजले आणि ४० मुलांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले गेले.n ६ ऑगस्ट, २०२० - अहमदाबादेत श्रेया रुग्णालयात ८ रुग्णांचा मृत्यू.n २७ नोव्हेंबर, २०२० - राजकोटमध्ये उदय शिवानंद रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू. पाच महिन्यांत गुजरातमध्ये रुग्णालयात आगीच्या सात घटना घडल्या.

 

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटलBhandara Fireभंडारा आग