शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांचा जी.आर. अडकला

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

नागपूर: २०१४ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पीक हानीसाठी मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. पण त्यानंतर दोन आठवडे झाले तरी अद्याप मदत व पुनर्वसन खात्याने याचा अद्याप जी.आर. काढला नाही. त्यामळे मदत वाटप होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागातही गारपिटीचा फटका बसला होता हे येथे उल्लेखनीय.

नागपूर: २०१४ च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या पीक हानीसाठी मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. पण त्यानंतर दोन आठवडे झाले तरी अद्याप मदत व पुनर्वसन खात्याने याचा अद्याप जी.आर. काढला नाही. त्यामळे मदत वाटप होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. नागपूर विभागातही गारपिटीचा फटका बसला होता हे येथे उल्लेखनीय.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विदर्भासह राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी,अशी मागणी हिवाळी अधिवेशन काळात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती. अधिवेशन काळात दुष्काळाचा मुद्दा गाजला होता. त्यामुळे शासनाने अधिवेशन काळातच दुष्काळग्रस्तांसाठी मदत जाहीर केली व त्याचे सध्या वाटप सुरूआहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यात कोरडवाहू पिकांसाठी प्रती हेक्टर १० हजार रुपये तर ओलिताखालील पिकांसाठी प्रती हेक्टर १५ हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गारपिटीमुळे मृत्यू झाला असेल तर अडीच लाख रुपये, मोठ्या जनावरांसाठी २५ हजार रुपये, लहान जनावरांसाठी ५ हजार रुपये, पडझड झालेल्या पक्क्या घरासाठी ७० हजार, कच्च्या घरासाठी २५ हजार रुपये व अंशत: पडलेल्या घरासाठी १५ हजार रुपये मदतीची तरतूद आहे. मात्र मदत व पुनर्वसन खात्याने अद्याप त्याचा जी.आर. काढला नाही. जी.आर. निघाल्याशिवाय मदत वाटप सुरू होत नाही. त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांच्या हाती पडण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान टंचाईग्रस्त आणि गारपीटग्रस्त याबाबत खुलासा होण्याची गरज आहे. सध्या टंचाईग्रस्तांना मदत वाटप सुरू आहे. त्यानंतर गारपीटग्रस्तांसाठी मदत जाहीर झाली आहे. ही मदत सरसकट सर्वांनाच मिळणार की त्यातून टंचाईग्रस्त शेतकऱ्यांना वगळले जाणार याबाबत संभ्रम आहे. याचा खुलासा प्रशासकीय यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)