शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 22:02 IST

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथे छापेमारी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानेपश्चिम बंगाल राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी (९ जानेवारी) ही माहिती दिली. या हल्ल्याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती राज्य सरकारने लवकरात लवकर द्यावी, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी ५ जानेवारीची घटना जनक्षोभातून घडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.पश्चिम बंगालचे कृषी मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी दावा केला की तपास यंत्रणा छापे टाकणाऱ्या देशाच्या इतर भागातही असे हल्ले होतील. 

एका कार्यक्रमात शोभनदेब चट्टोपाध्याय म्हणाले, "राज्यात एका ठिकाणी जनक्षोभाचा स्फोट आम्ही पाहिला... भविष्यात भारतात इतर ठिकाणीही अशा घटना घडतील." मंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपा खासदार दिलीप घोष म्हणाले की, जनता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला वाचवायचे असेल तर सत्तेतून ताबडतोब हकालपट्टी करावी.

ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकरणगेल्या 5 जानेवारीला ईडीचे पथक राज्याच्या रेशन व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या संदर्भात संदेशखळी येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले होते, तेव्हा शेख यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, ईडीने सांगितले होते की, आमच्या तपासादरम्यान अनेक लोकांनी ईडी टीम आणि सीआरपीएफ जवानांवर एका कंपाउंडमध्ये त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. हे लोक काठ्या, दगड, विटा अशा शस्त्रांस्त्रे घेऊन तयार होते. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय