शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 22:02 IST

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथे छापेमारी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानेपश्चिम बंगाल राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी (९ जानेवारी) ही माहिती दिली. या हल्ल्याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती राज्य सरकारने लवकरात लवकर द्यावी, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी ५ जानेवारीची घटना जनक्षोभातून घडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.पश्चिम बंगालचे कृषी मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी दावा केला की तपास यंत्रणा छापे टाकणाऱ्या देशाच्या इतर भागातही असे हल्ले होतील. 

एका कार्यक्रमात शोभनदेब चट्टोपाध्याय म्हणाले, "राज्यात एका ठिकाणी जनक्षोभाचा स्फोट आम्ही पाहिला... भविष्यात भारतात इतर ठिकाणीही अशा घटना घडतील." मंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपा खासदार दिलीप घोष म्हणाले की, जनता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला वाचवायचे असेल तर सत्तेतून ताबडतोब हकालपट्टी करावी.

ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकरणगेल्या 5 जानेवारीला ईडीचे पथक राज्याच्या रेशन व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या संदर्भात संदेशखळी येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले होते, तेव्हा शेख यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, ईडीने सांगितले होते की, आमच्या तपासादरम्यान अनेक लोकांनी ईडी टीम आणि सीआरपीएफ जवानांवर एका कंपाउंडमध्ये त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. हे लोक काठ्या, दगड, विटा अशा शस्त्रांस्त्रे घेऊन तयार होते. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय