शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

हनुमान जयंतीला कायदा आणि सुव्यवस्था राखा, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 08:29 IST

गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली : रामनवमीच्या मुहूर्तावर देशभरात अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. गृह मंत्रालयाने आता हनुमान जयंती संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत सर्व राज्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आले आहे.

हनुमान जयंतीच्या तयारीबाबत मंत्रालयाने सर्व राज्यांना एक अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले आहे. याशिवाय, सण शांततेत पाळण्यास आणि समाजातील जातीय सलोखा बिघडविणाऱ्यांवर नजर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर कोलकाता उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. हनुमान जयंतीनिमित्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत, अशी विचारणा न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला केली. यासोबतच हनुमान जयंतीनिमित्त शांतता राखण्यासाठी पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्रीय दलाची मागणी करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.

उच्च न्यायालयाने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्यारामनवमीच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराबद्दल मंगळवारी उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून अहवाल मागवला होता. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टीएस. शिवज्ञानम आणि हिरणमय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला या संदर्भात पुरवणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आणि रिसडा येथील हिंसाचाराच्या कारणांची माहिती मागवली होती.

गृह मंत्रालयाने बंगालमध्ये पाठवले निमलष्करी दल कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्वरीत कार्य करत, केंद्रीय गृह मंत्रालयाने हनुमान जयंती दरम्यान पश्चिम बंगालमधील राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी निमलष्करी दल तैनात केले आहे. गृहमंत्र्यांच्या प्रवक्त्याने बुधवारी संध्याकाळी उशिरा ट्विट केले, "हनुमान जयंती दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत." 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयHanuman Jayantiहनुमान जयंती