शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

BSF चे अधिकार क्षेत्र वाढवण्यावरुन पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 11:13 AM

गृह मंत्रालयाने बुधवारी तीन राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र वाढवलं, यात पंजाबचाही समावेश आहे. आता पंजाबमध्ये बीएसएफचे कार्यक्षेत्र 15 किमीवरुन 50 किमी करण्यात आलं आहे.

पंजाबमध्ये आधीच सुरू असलेल्या राजकीय गोंधळामध्ये आता बीएसएफचे कार्यक्षेत्रावरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाने बुधवारी तीन राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढवले, यामध्ये पंजाबचाही समावेश आहे. पण, यावर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पण, दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. 

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. यावर कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, 'काश्मीरमध्ये दररोज भारतीय सैनिक मारले जात आहेत. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांकडून पंजाबमध्येही शस्त्रे आणि अंमली पदार्थ पाठवण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवल्यामुळे या सर्व गोष्टींवर आळा बसू शकतो. केंद्रीय सशस्त्र दलांना राजकारणात ओढू नये', असं ते म्हणाले.

अमरिंदर सिंग पुढे म्हणाले, 'राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत पक्षपाती विचार कुणी करू नये. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी मी तेच बोललो होतो आणि आजही सांगतो आहे. जेव्हा देशाची सुरक्षा धोक्यात येते, तेव्हा राजकारणाच्या वर विचार करायला हवा. आज पुन्हा एकदा देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे.'

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोधपंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. 'आंतरराष्ट्रीय सीमेवर 50 किमी आतपर्यंत बीएसएफला अतिरिक्त अधिकार देण्याच्या भारत सरकारच्या एकतर्फी निर्णयाचा मी तीव्र निषेध करतो. हा राज्यायवर केलेला थेट हल्ला आहे. मी गृहमंत्री अमित शहा यांना हा निर्णय त्वरित मागे घेण्याची विनंती करतो,'असं चन्नी म्हणाले.

टॅग्स :PunjabपंजाबCaptain Amarinder Singhकॅप्टन अमरिंदर सिंगBSFसीमा सुरक्षा दलHome Ministryगृह मंत्रालय