शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर गृहमंत्री शहा नाराज, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काही उल्लेख टाळायला हवे होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 07:03 IST

महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे का रण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच ठेवल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लिहिले होते. (Home Minister Shah)

ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या उल्लेखाने शहा नाराज झाले आहेत.महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे कारण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच आहेत.

नवी दिल्ली :  ‘तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता अचानक तुम्ही सेक्युलर झालात का?’ असा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका पत्रामध्ये केलेला उल्लेख टाळायला हवा होता, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या उल्लेखाने शहा नाराज झाले आहेत.

महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे कारण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच ठेवल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्या पत्रावरून मोठा वाद झाला होता. राज्यात घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अशा प्रकारची भाषा असावी का, यावरही खूप चर्चा झडली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी आपले मत व्यक्त केले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपली भावना अधिक उत्तम शब्दांत व्यक्त करता आली असती. 

या पत्रात भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटले होते की, मुख्यमंत्री होताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजाही केली होती. तुम्ही स्वत:ला रामभक्त म्हणवता व मग आता तुम्हाला प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी दैवी संकेत मिळणार आहेत का? 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या हिंदुत्त्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांबाबत जे उद्गार काढले त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते. शेरेबाजी अयोग्य -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात कोश्यारी यांनी केलेली शेरेबाजी अयोग्य होती. त्यांनी त्या पत्रामध्ये काही शब्द वापरले नसते तर बरे झाले असते. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे