शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

"काँग्रेसने त्यांना वेळ दिला नाही, भाजपच्या वेळेतील अर्धा तास द्या", अमित शाहांचा अधीर रंजन यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 22:18 IST

विरोधी पक्षांचा मोदींवर विश्वास नसेल, पण देशातील जनता मोदींसोबत आहे, असे अमित शाह म्हणाले.

नवी दिल्ली :  लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Lok Sabha) यांनी बुधवारी विरोधकांच्या अविश्वास ठरावाविरोधात भाषण केले. यावेळी अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, भाषणादरम्यान सतत अडवणूक करणारे काँग्रेस नेते अधीर रंजन यांनाही अमित शाह यांनी सोडले नाही. दरम्यान, अमित शाह काश्मीर मुद्द्यावर बोलत असताना अधीर रंजन यांनी जोरदार भाषणबाजी सुरू केली. यावर अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसने अधीरजींना वेळ दिला नाही, त्यांना भाजपच्या वेळेतील अर्धा तास द्या. त्यांच्या पक्षाने त्यांना वेळ दिला नाही म्हणून ते मध्येच बोलतात. आमचे संसदीय कामकाज मंत्रीही माझ्या या विनंतीला विरोध करणार नाहीत."

विरोधी पक्षांचा मोदींवर विश्वास नसेल, पण देशातील जनता मोदींसोबत आहे, असे अमित शाह म्हणाले. ते म्हणाले की, कोरोनाच्या काळात विरोधी पक्षांचे नेते म्हणाले होते की, ही मोदींची लस आहे, घेऊ नका; पण जनतेने पीएम मोदींवर विश्वास दाखवला आणि सर्व डोस पूर्ण केले. विरोधकांनीही लॉकडाऊनला विरोध करत गरीब काय खाणार असा सवाल केला होता. सरकारने लॉकडाऊन लागू केला तेव्हा एकही गरीब उपाशी राहिला नाही. ८० कोटी लोकांना मोफत गहू दिला, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, अमित शाह यांनी लोकसभेत मणिपूर हिंसाचाराची संपूर्ण माहिती दिली. यावेळी अमित शहा यांनी विरोधकांना घेरले आणि म्हटले की, मणिपूरमध्ये घडलेली घटना लज्जास्पद आहे, मात्र त्यावर राजकारण करणे त्याहूनही लज्जास्पद आहे. तसेच, देशात गैरसमज पसरवला गेला आहे की या सरकारला मणिपूरवर चर्चा करायची नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून चर्चा करण्यास तयार होतो. तुम्ही चर्चा करायलाही तयार नव्हते. गदारोळ करून तुम्ही आम्हाला गप्प कराल असे तुम्हाला वाटते. आपण ते करू शकत नाही. या देशातील १३० कोटी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवलं नाही? ४ मेच्या व्हिडिओवर अमित शाह म्हणाले की, तो व्हिडिओ संसदेच्या अधिवेशनाच्या एक दिवस आधी का आला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर का टाकण्यात आला. तो पोलिसांना का दिला नाही?  मी मणिपूरच्या जनतेला आवाहन करतो की हिंसा हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. याचबरोबर, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना न हटवल्याबद्दल अमित शहा म्हणाले की, राज्य सरकार सहकार्य करत नाही तेव्हा कलम ३५६ लागू केले जाते. आम्ही डीजीपीला हटवले. त्यांनी केंद्राचा निर्णय मान्य केला. मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांना काढून टाकले जाते, पण मणिपूरचे मुख्यमंत्री सहकार्य करत आहेत, असे अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाParliamentसंसदManipur Violenceमणिपूर हिंसाचार