शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देशातील वीज संकटावर गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बैठक, NTPCचे अधिकारीही उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:19 IST

दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाबसह अनेक राज्यांनी कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकटाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला मदतीचं आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये आलेल्या वीज संकटाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, ऊर्जा मंत्री आर.के. सिंह आणि एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतातील वीज निर्मितीची परिस्थिती आणि कोळशाच्या साठ्याविषयी सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली.

केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार म्हणाले की, देशातील वीज पुरवठ्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. काही राज्यांमध्ये काही भागात विजेची कमतरता आहे, पण वीज पुरवठ्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. विजेचा तुटवडा फार गंभीर नाही. काही राज्यांमध्ये कोळसा कंपन्यांकडे प्रचंड थकबाकी आहे, तर काही राज्यांमध्ये कोळशाचा साठा कमी आहे. पुरवठा कायम राहण्यासाठी महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि यूपीला कोळसा कंपन्यांची थकबाकी भरावी लागेल. 

अनेक राज्यांमध्ये वीज संकट!

दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाबसह अनेक राज्यांनी कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकटाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन केलं आहे. यासोबतच राज्यातील नागरिकांना विजेची बचत करण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. तर, केंद्राकडून देशात कोळशाचा पुरेसा साठा असून वीज संकटाची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय.

यापूर्वीच कोळसा मंत्रालयाने रविवारी स्पष्टपणे सांगितलं होतं की, देशाकडे वीजनिर्मिती संयंत्रांची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध आहे. मंत्रालयाने कोळशाच्या कमतरतेमुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. मंत्रालयाने सांगितल्यानुसार, वीज प्रकल्पांमध्ये सुमारे 72 लाख टन कोळसा साठा आहे, जो चार दिवसांसाठी पुरेसा आहे. कोल इंडियाकडे 400 लाख टन साठा आहे, तो वीज प्रकल्पांना पुरवला जात आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहCoal Shortageकोळसा संकटelectricityवीज