शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

देशातील वीज संकटावर गृहमंत्री अमित शहा यांची मोठी बैठक, NTPCचे अधिकारीही उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:19 IST

दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाबसह अनेक राज्यांनी कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकटाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला मदतीचं आवाहन केलं आहे.

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांमध्ये आलेल्या वीज संकटाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, ऊर्जा मंत्री आर.के. सिंह आणि एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी भारतातील वीज निर्मितीची परिस्थिती आणि कोळशाच्या साठ्याविषयी सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना दिली.

केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार म्हणाले की, देशातील वीज पुरवठ्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. काही राज्यांमध्ये काही भागात विजेची कमतरता आहे, पण वीज पुरवठ्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. विजेचा तुटवडा फार गंभीर नाही. काही राज्यांमध्ये कोळसा कंपन्यांकडे प्रचंड थकबाकी आहे, तर काही राज्यांमध्ये कोळशाचा साठा कमी आहे. पुरवठा कायम राहण्यासाठी महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि यूपीला कोळसा कंपन्यांची थकबाकी भरावी लागेल. 

अनेक राज्यांमध्ये वीज संकट!

दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाबसह अनेक राज्यांनी कोळशाच्या कमतरतेमुळे वीज संकटाचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन केलं आहे. यासोबतच राज्यातील नागरिकांना विजेची बचत करण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. तर, केंद्राकडून देशात कोळशाचा पुरेसा साठा असून वीज संकटाची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलंय.

यापूर्वीच कोळसा मंत्रालयाने रविवारी स्पष्टपणे सांगितलं होतं की, देशाकडे वीजनिर्मिती संयंत्रांची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध आहे. मंत्रालयाने कोळशाच्या कमतरतेमुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. मंत्रालयाने सांगितल्यानुसार, वीज प्रकल्पांमध्ये सुमारे 72 लाख टन कोळसा साठा आहे, जो चार दिवसांसाठी पुरेसा आहे. कोल इंडियाकडे 400 लाख टन साठा आहे, तो वीज प्रकल्पांना पुरवला जात आहे. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहCoal Shortageकोळसा संकटelectricityवीज