शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राशी संबंधित कलम ३७१ ही हटवणार का?... गृहमंत्री अमित शहा यांचं लोकसभेत मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:39 IST

लोकसभेतील चर्चेदरम्यान, कलम ३७१ बाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केले मोठे वक्तव्य.

नवी दिल्ली -  काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबतच्या विधेयकावर आज दिवसभर लोकसभेत वादळी चर्चा झाली. दरम्यान, या लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक स्पष्ट करतानाच कलम ३७१ मधील कुठल्याही तरतुदी हटवण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केले.अमित शहा लोकसभेत म्हणाले की, ''कलम ३७० हे काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम हटवण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकार कलम ३७१ सुद्धा हटवणार असा अपप्रचार विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र मी महाराष्ट्र आणि पूर्वोत्तर भारतातील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की कलम ३७१ हटवण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नाही.'' असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. तसेच कलम ३७० आणि कलम ३७१ मधील फरक जनता जाणते, असा टोलाही अमित शहा यांनी लगावला. ''कलम ३७० बाबत पंडित नेहरू म्हणाले होते की, कलम ३७० हे अस्थायी स्वरूपाचे आहे. योग्य वेळ येताच ते समाप्त होईल. मात्र ती वेळ येता येता ७० वर्षे उलटून गेली. पण आम्ही काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी ७० वर्षे लावणार नाही.'' असेही अमित शहा यांनी सांगितले. 

काय आहे कलम ३७१ 

कलम ३७१ मधील मुंबई पुनर्गठन अधिनियम १९६० मधील संशोधनानुसार कलम ३७१ (२) अन्वये १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांवर लागू करण्यात आले होतो. त्यानुसार गुजरात या नव्या राज्याची निर्मिती करण्यासाठी कच्छ आणि सौराष्ट्र ही राज्ये मुंबई प्रांतापासून वेगळी करण्यात आली. तसेच मुंबई राज्याचे नामकरण महाराष्ट्र असे करण्यात आले. तसेच यामधील तरतुदींनुसार विदर्भ आणि मराठवाडा हे विभाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आले होते. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-ए