शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मणिपूर हिंसाचार : शांतता प्रस्थापित करा, कडक कारवाईचे निर्देश; अमित शाहांची उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 22:44 IST

जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमित शाह सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत.

 इंफाळ : मणिपूरमधील शांतता आणि समृद्धी ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी मंगळवारी सांगितले. तसेच, सुरक्षा अधिकाऱ्यांना शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीला कठोरपणे सामोरे जाण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी इंफाळमध्ये पोलीस, सीएपीएफ आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही माहिती दिली. जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमित शाह सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत.

यासंदर्भात अमित शाह यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, " इंफाळमध्ये मणिपूर पोलिस, सीएपीएफ आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरची शांतता आणि समृद्धी ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीला कठोरपणे सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहेत."  दरम्यान, मणिपूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमित शाह यांनी समाजातील महिलांच्या भूमिकेच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की, राज्यात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कटिबद्ध आहोत.

गृहमंत्री अमित शाह मोरेह आणि कांगपोकपी भागाला भेट देणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चुराचांदपूरला भेट देऊन प्रमुख व्यक्ती आणि नागरी संस्थांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. त्यानंतर संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंफाळमध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली. यानंतर आता अमित शाह उद्या मणिपूरच्या मोरेह आणि कांगपोकपी भागाला भेट देणार आहेत. यावेळी अमित शाह मोरेह येथील विविध स्थानिक गटांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करतील आणि त्यानंतर कांगपोकपी येथे नागरी समाज संघटनांशी बैठक घेतील. त्यानंतर ते इंफाळमध्ये सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत.

10 लाख रुपये, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी...केंद्र आणि मणिपूर सरकारने राज्यातील जातीय दंगलीदरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही दिली जाणार आहे. दरम्यान, नुकसान भरपाईची रक्कम केंद्र आणि राज्य सरकार समान पद्धतीने उचलेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहManipur Violenceमणिपूर हिंसाचार