शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर हिंसाचार : शांतता प्रस्थापित करा, कडक कारवाईचे निर्देश; अमित शाहांची उच्चस्तरीय बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 22:44 IST

जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमित शाह सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत.

 इंफाळ : मणिपूरमधील शांतता आणि समृद्धी ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी मंगळवारी सांगितले. तसेच, सुरक्षा अधिकाऱ्यांना शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीला कठोरपणे सामोरे जाण्याचे निर्देश दिले. दरम्यान, मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी इंफाळमध्ये पोलीस, सीएपीएफ आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही माहिती दिली. जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमित शाह सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत.

यासंदर्भात अमित शाह यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, " इंफाळमध्ये मणिपूर पोलिस, सीएपीएफ आणि भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. मणिपूरची शांतता आणि समृद्धी ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, शांतता बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीला कठोरपणे सामोरे जाण्याचे निर्देश दिले आहेत."  दरम्यान, मणिपूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमित शाह यांनी समाजातील महिलांच्या भूमिकेच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की, राज्यात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कटिबद्ध आहोत.

गृहमंत्री अमित शाह मोरेह आणि कांगपोकपी भागाला भेट देणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चुराचांदपूरला भेट देऊन प्रमुख व्यक्ती आणि नागरी संस्थांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली. त्यानंतर संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इंफाळमध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली. यानंतर आता अमित शाह उद्या मणिपूरच्या मोरेह आणि कांगपोकपी भागाला भेट देणार आहेत. यावेळी अमित शाह मोरेह येथील विविध स्थानिक गटांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करतील आणि त्यानंतर कांगपोकपी येथे नागरी समाज संघटनांशी बैठक घेतील. त्यानंतर ते इंफाळमध्ये सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत.

10 लाख रुपये, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी...केंद्र आणि मणिपूर सरकारने राज्यातील जातीय दंगलीदरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. दंगलीत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरीही दिली जाणार आहे. दरम्यान, नुकसान भरपाईची रक्कम केंद्र आणि राज्य सरकार समान पद्धतीने उचलेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्यात सोमवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहManipur Violenceमणिपूर हिंसाचार