शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

'गृहमंत्री' अमित शहा लागले कामाला; जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशाच बदलणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 19:18 IST

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 111 जागा आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कामाला लागले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन आयोगाची स्थापना करण्याचा विचार गृहमंत्री अमित शहा करत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशाच अमित शहा बदलणार की काय, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या आदेशानुसार 1995 साली जम्मू-काश्मीरमध्ये 87 जागांचे सीमांकन (फेररचना) करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 111 जागा आहेत. मात्र, 24 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या संविधानमधील सेक्शन 47 नुसार पाकव्याप्त काश्मीरसाठी या 24 जागा रिकामी ठेवण्यात आल्या आहेत. तर बाकीच्या 87 जागांवर निवडणुका घेतल्या जातात. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरचे वेगळे संविधान आहे.

जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार, दर दहा वर्षानंतर मतदारसंघांचे सीमाकंन केले पाहिजे. यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये 2005 मध्ये मतदारसंघांसाठी सीमांकन केले पाहिजे होते. मात्र, फारुक अब्दुल्ला सरकारने 2002 मध्ये याला 2026 पर्यंत थांबविले होते. अब्दुल्ला सरकारने जम्मू-काश्मीर जनप्रतिनिधित्व कायदा, 1957 आणि जम्मू-काश्मीरच्या संविधानात बदल करतेवेळी हा निर्णय घेतला होता.

जाणून घ्या, कशी आहे जम्मू-काश्मीर विधानसभेची संरचना2011 च्या जणगणनेनुसार जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू विभागातील लोकसंख्या 53,78,538 आहे. ही राज्यातील 42.89 टक्के लोकसंख्या आहेत. तर, जम्मू-काश्मीरचे 25.93 टक्के क्षेत्रफळ जम्मू विभागाच्या अंतर्गत येते. विधासभेसाठी या भागात एकूण 37 जागा आहेत. दुसरीकडे, काश्मीर घाटीत 68,88,475 लोकसंख्या आहे. ही राज्यातील 54.93 टक्के लोकसंख्या आहे. काश्मीर घाटीतून विधानसभेवर एकूण 46 आमदार निवडणूक जातात. याशिवाय, लडाखमध्ये चार जागा आहेत. लडाखमधून चार आमदार निवडले जातात.   

एससी-एसटी आरक्षणसाठी होणार सीमांकन (फेररचना)सुत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण, एससी आणि एसटी समुदायासाठी जागांच्या आरक्षणाची नवीन व्यवस्था लागू करण्यात येईल. घाटीत कोणत्याही जागांवर आरक्षण नाही. मात्र, याठिकाणी 11 टक्के गुर्जर बकरवाल आणि गद्दी जनजाति समुदायाचे लोक आहेत. जम्मू विभागात 7 जागा एससीसाठी आरक्षित आहेत. जागांची अदला-बदली सुद्धा झाली नाही. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सीमांकन केल्यास सामाजिक समीकरणांवर सुद्धा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीर