शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर - मोदी

By admin | Updated: June 11, 2014 18:28 IST

भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११- भारताच्या स्वातंत्र्याला  २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असे भावनिक आवाहनही त्यांनी लोकसभेतील सदस्यांना केले आहे. 
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींचे हे लोकसभेतील पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लोकसभेतील पहिल्याच भाषणात मोदींनी त्यांच्या सरकारची दोन प्रमूख उद्दीष्ट मांडले. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक नागरिकाकडे पाणी, वीज, शौचालय अशी मूलभूत सुविधा असलेले घर असायला हवे असा संकल्प मोदींनी केला. तसेच पाच वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीला १५० वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी आपण गांधींजींनी स्वच्छ भारत भेट म्हणून देऊ शकतो असे मोदींनी सांगितले. 
राष्ट्रपतींनी सादर केलेल्या अभिभाषणावर मोदी म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण ही आमच्यासाठी परंपरा नाही. त्यांनी अभिभाषणातून मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची, आश्वासनाची पूर्तता करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. निवडणुकीपूर्वी आपण सर्व उमेदवार होतो. पण लोकसभेत निवडून आल्यावर आपण आशेचे दूत आहोत. राष्ट्रपतींनी मांडलेल्या अजेंड्यातील आश्वासन पूर्ण करण्यास सरकार प्रयत्न करेल. यात काही अडचण आल्यास लोकसभेतील ज्येष्ठ सदस्यांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल अशी आशा दर्शवत त्यांनी विरोधकांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असे संकेत दिले. या भाषणात मोदींनी मुसलमान भाई असा उल्लेख करत समाजातील दलित व मुस्लिम समाजाचा विकास व्हायला हवे. समाजातील एक अंग अशक्त राहिल्यास समाज सशक्त होऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
>  देशातील सरकार हे केवळ श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठीही आहे. गरिबांना यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांची अंधश्रध्देतून मुक्तता करण्याची आवश्यकता आहे. 
> देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न करायला हवेत.
> महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे रुप दिले होते. त्यानुसार आता विकासाचे जनआंदोलन निर्माण करण्याची गरज. देशातील प्रत्येक व्यक्ती देशासाठी काम करतोय ही भावना निर्माण करायला हवी.  
> बलात्कारसारख्या गंभीर घटनांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे राजकीय नेत्यांनी टाळावे. अशा घटनांवर मनोवैज्ञानिक चर्चा करणे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. 
> भारताची स्कॅम इंडिया ही ओळख पुसून स्किल इंडिया ही नवी ओळख निर्माण करायची आहे. देशात युवकांचा भरणा असल्याने कौशल्यविकासावर भर देण्याची गरज. नुसती पदवी घेऊन पुरेसे नसते. तर त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे.