शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर - मोदी

By admin | Updated: June 11, 2014 18:28 IST

भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११- भारताच्या स्वातंत्र्याला  २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असे भावनिक आवाहनही त्यांनी लोकसभेतील सदस्यांना केले आहे. 
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींचे हे लोकसभेतील पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लोकसभेतील पहिल्याच भाषणात मोदींनी त्यांच्या सरकारची दोन प्रमूख उद्दीष्ट मांडले. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक नागरिकाकडे पाणी, वीज, शौचालय अशी मूलभूत सुविधा असलेले घर असायला हवे असा संकल्प मोदींनी केला. तसेच पाच वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीला १५० वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी आपण गांधींजींनी स्वच्छ भारत भेट म्हणून देऊ शकतो असे मोदींनी सांगितले. 
राष्ट्रपतींनी सादर केलेल्या अभिभाषणावर मोदी म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण ही आमच्यासाठी परंपरा नाही. त्यांनी अभिभाषणातून मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची, आश्वासनाची पूर्तता करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. निवडणुकीपूर्वी आपण सर्व उमेदवार होतो. पण लोकसभेत निवडून आल्यावर आपण आशेचे दूत आहोत. राष्ट्रपतींनी मांडलेल्या अजेंड्यातील आश्वासन पूर्ण करण्यास सरकार प्रयत्न करेल. यात काही अडचण आल्यास लोकसभेतील ज्येष्ठ सदस्यांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल अशी आशा दर्शवत त्यांनी विरोधकांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असे संकेत दिले. या भाषणात मोदींनी मुसलमान भाई असा उल्लेख करत समाजातील दलित व मुस्लिम समाजाचा विकास व्हायला हवे. समाजातील एक अंग अशक्त राहिल्यास समाज सशक्त होऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
>  देशातील सरकार हे केवळ श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठीही आहे. गरिबांना यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांची अंधश्रध्देतून मुक्तता करण्याची आवश्यकता आहे. 
> देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न करायला हवेत.
> महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे रुप दिले होते. त्यानुसार आता विकासाचे जनआंदोलन निर्माण करण्याची गरज. देशातील प्रत्येक व्यक्ती देशासाठी काम करतोय ही भावना निर्माण करायला हवी.  
> बलात्कारसारख्या गंभीर घटनांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे राजकीय नेत्यांनी टाळावे. अशा घटनांवर मनोवैज्ञानिक चर्चा करणे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. 
> भारताची स्कॅम इंडिया ही ओळख पुसून स्किल इंडिया ही नवी ओळख निर्माण करायची आहे. देशात युवकांचा भरणा असल्याने कौशल्यविकासावर भर देण्याची गरज. नुसती पदवी घेऊन पुरेसे नसते. तर त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे.