शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर - मोदी

By admin | Updated: June 11, 2014 18:28 IST

भारताच्या स्वातंत्र्याला २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवले आहे.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ११- भारताच्या स्वातंत्र्याला  २०२२ मध्ये ७५ वर्ष होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक भारतीयाकडे स्वतःचे हक्काचे घर असायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.  हे उद्दीष्ट गाठण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असे भावनिक आवाहनही त्यांनी लोकसभेतील सदस्यांना केले आहे. 
लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर दिले. पंतप्रधान मोदींचे हे लोकसभेतील पहिलेच भाषण असल्याने ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लोकसभेतील पहिल्याच भाषणात मोदींनी त्यांच्या सरकारची दोन प्रमूख उद्दीष्ट मांडले. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी देशातील प्रत्येक नागरिकाकडे पाणी, वीज, शौचालय अशी मूलभूत सुविधा असलेले घर असायला हवे असा संकल्प मोदींनी केला. तसेच पाच वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीला १५० वर्ष पूर्ण होणार असून त्यावेळी आपण गांधींजींनी स्वच्छ भारत भेट म्हणून देऊ शकतो असे मोदींनी सांगितले. 
राष्ट्रपतींनी सादर केलेल्या अभिभाषणावर मोदी म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण ही आमच्यासाठी परंपरा नाही. त्यांनी अभिभाषणातून मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याची, आश्वासनाची पूर्तता करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. निवडणुकीपूर्वी आपण सर्व उमेदवार होतो. पण लोकसभेत निवडून आल्यावर आपण आशेचे दूत आहोत. राष्ट्रपतींनी मांडलेल्या अजेंड्यातील आश्वासन पूर्ण करण्यास सरकार प्रयत्न करेल. यात काही अडचण आल्यास लोकसभेतील ज्येष्ठ सदस्यांकडून आम्हाला मार्गदर्शन मिळेल अशी आशा दर्शवत त्यांनी विरोधकांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असे संकेत दिले. या भाषणात मोदींनी मुसलमान भाई असा उल्लेख करत समाजातील दलित व मुस्लिम समाजाचा विकास व्हायला हवे. समाजातील एक अंग अशक्त राहिल्यास समाज सशक्त होऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
>  देशातील सरकार हे केवळ श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठीही आहे. गरिबांना यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच त्यांची अंधश्रध्देतून मुक्तता करण्याची आवश्यकता आहे. 
> देशाने गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न करायला हवेत.
> महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढ्याला जनआंदोलनाचे रुप दिले होते. त्यानुसार आता विकासाचे जनआंदोलन निर्माण करण्याची गरज. देशातील प्रत्येक व्यक्ती देशासाठी काम करतोय ही भावना निर्माण करायला हवी.  
> बलात्कारसारख्या गंभीर घटनांचे मनोवैज्ञानिक विश्लेषण करणे राजकीय नेत्यांनी टाळावे. अशा घटनांवर मनोवैज्ञानिक चर्चा करणे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. 
> भारताची स्कॅम इंडिया ही ओळख पुसून स्किल इंडिया ही नवी ओळख निर्माण करायची आहे. देशात युवकांचा भरणा असल्याने कौशल्यविकासावर भर देण्याची गरज. नुसती पदवी घेऊन पुरेसे नसते. तर त्यांच्यात विशेष कौशल्य असणे गरजेचे.