शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादमध्ये होळी साजरी करण्यावर कडक निर्बंध, "तुम्ही CM की निजाम?’’, संतप्त भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:33 IST

Hyderabad Holi News: देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र काही ठिकाणी या सणाला गालबोट लागण्याच्या घटनाही घडत आहेत. तर काही ठिकाणी होळीसाठीच्या नियमांवरून वाद होत आहेत. आता तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र काही ठिकाणी या सणाला गालबोट लागण्याच्या घटनाही घडत आहेत. तर काही ठिकाणी होळीसाठीच्या नियमांवरून वाद होत आहेत. आता तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करताना जबरदस्तीने रंग लावण्यावर आणि गटागटाने वाहनं चालवण्यावर बंदी घातली आहे. शहरात शांतता कायम राहावी यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र भाजपाने याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली असून, भाजपा आमदार राजा सिंह यांनी सरकारचे हे आदेश म्हणजे तुघलकी फर्मान असल्याचे सांगितले आहे. तसेच तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेंवंत रेड्डी हे नववे निजाम असल्याची टीका त्यांनी केली.

होळीसाठी हैदराबाद पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार १३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वारेजपर्यंत रस्त्यांवरून गटागटांनी वाहनं चालवता येणार नाहीत. तसेच कुणावरही जबरदस्तीने रंग टाकण्यास किंवा रंगीत पाणी फेकण्यास मनाई असेल. त्याशिवाय १४ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मद्य आणि ताडीची दुकानं बंद राहतील. मात्र फाईव्ह स्टार हॉटेल आणि क्लबवर बंदी नसेल.

दरम्यान, भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी मात्र या बंदीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, हा आदेश हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी देण्यात आला आहे. रमजानच्या ३० दिवसांमध्ये जेव्हा लोक रात्रभर रस्त्यांवर दुकाची आणि गाड्या घेऊन फिरतात तेव्हा पोलिसांना त्रास होत नाही? मात्र होळीसाठी अचानक निर्बंध लादण्यात आले आहेत, असा आरोप केला.

काँग्रेस पक्ष हा एका खास समाजाचा गुलाम झाला आहे. तसेच हिंदूंविरोधात निर्णय घेत आहे. निजामाच्या काळात हिंदूंवर अत्याचार व्हायचे. आता रेवंत रेड्डी तेच करत आहेत, असा आरोपही राजा सिंह यांनी केला.    

टॅग्स :Holiहोळी 2025Telanganaतेलंगणा