शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

हैदराबादमध्ये होळी साजरी करण्यावर कडक निर्बंध, "तुम्ही CM की निजाम?’’, संतप्त भाजपाचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 20:33 IST

Hyderabad Holi News: देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र काही ठिकाणी या सणाला गालबोट लागण्याच्या घटनाही घडत आहेत. तर काही ठिकाणी होळीसाठीच्या नियमांवरून वाद होत आहेत. आता तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. मात्र काही ठिकाणी या सणाला गालबोट लागण्याच्या घटनाही घडत आहेत. तर काही ठिकाणी होळीसाठीच्या नियमांवरून वाद होत आहेत. आता तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तेलंगाणा सरकारने हैदराबाद आणि सायबराबादमध्ये होळी साजरी करताना जबरदस्तीने रंग लावण्यावर आणि गटागटाने वाहनं चालवण्यावर बंदी घातली आहे. शहरात शांतता कायम राहावी यासाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र भाजपाने याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली असून, भाजपा आमदार राजा सिंह यांनी सरकारचे हे आदेश म्हणजे तुघलकी फर्मान असल्याचे सांगितले आहे. तसेच तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेंवंत रेड्डी हे नववे निजाम असल्याची टीका त्यांनी केली.

होळीसाठी हैदराबाद पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार १३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १५ मार्च रोजी संध्याकाळी ६ वारेजपर्यंत रस्त्यांवरून गटागटांनी वाहनं चालवता येणार नाहीत. तसेच कुणावरही जबरदस्तीने रंग टाकण्यास किंवा रंगीत पाणी फेकण्यास मनाई असेल. त्याशिवाय १४ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मद्य आणि ताडीची दुकानं बंद राहतील. मात्र फाईव्ह स्टार हॉटेल आणि क्लबवर बंदी नसेल.

दरम्यान, भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी मात्र या बंदीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, हा आदेश हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी देण्यात आला आहे. रमजानच्या ३० दिवसांमध्ये जेव्हा लोक रात्रभर रस्त्यांवर दुकाची आणि गाड्या घेऊन फिरतात तेव्हा पोलिसांना त्रास होत नाही? मात्र होळीसाठी अचानक निर्बंध लादण्यात आले आहेत, असा आरोप केला.

काँग्रेस पक्ष हा एका खास समाजाचा गुलाम झाला आहे. तसेच हिंदूंविरोधात निर्णय घेत आहे. निजामाच्या काळात हिंदूंवर अत्याचार व्हायचे. आता रेवंत रेड्डी तेच करत आहेत, असा आरोपही राजा सिंह यांनी केला.    

टॅग्स :Holiहोळी 2025Telanganaतेलंगणा