शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:59 IST

संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता असं कोर्टाने सांगितले.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरातील कलम ३७० हटवणे वैध की अवैध यावर सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. त्याठिकाणी कलम ३७० हटवले ते वैध असल्याचे सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. परंतु त्याचसोबत जम्मू काश्मीरात ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही करावी आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा असे निर्देश कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

कलम ३७० वर निकाल सुनावताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले की, जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्यायला हवा. परंतु लडाख केंद्रशासित प्रदेश कायम राहील. निवडणूक आयोगाने नवीन सीमारचनेच्या आधारे विधानसभा निवडणुका घ्याव्यात. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत याठिकाणी विधानसभा निवडणूक घ्यावी. जितकं शक्य असेल तितक्या लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जावा असं कोर्टाने सांगितले. 

तसेच संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता. जम्मू काश्मीरपासून लडाख स्वतंत्र्य करण्याचा सरकारचा निर्णय वैध आहे असं कोर्टाने म्हटलं. १६ दिवसांपासून सुरू असलेल्या घटनापीठाच्या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी एकूण २३ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात राजकीय नेते, सामाजिक संघटना, पत्रकार आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. 

सुप्रीम कोर्टाने काय काय म्हटलं?राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला आव्हान देणे वैध नाहीसंविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होतीसंविधान सभा भंग झाल्यानंतरही राष्ट्रपतींच्या आदेशावर कुठलीही बंधने नाहीतराष्ट्रपतींच्या अधिकाराचा गैरवापर झाला नाही त्यामुळे राज्याची सहमती घेण्याची आवश्यकता नाहीजम्मू काश्मीरातून लडाख केंद्र शासित बनवणे वैध जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा देऊन इथं निवडणूक घेण्यात यावी 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय