शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:59 IST

संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता असं कोर्टाने सांगितले.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरातील कलम ३७० हटवणे वैध की अवैध यावर सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. त्याठिकाणी कलम ३७० हटवले ते वैध असल्याचे सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. परंतु त्याचसोबत जम्मू काश्मीरात ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही करावी आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा असे निर्देश कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

कलम ३७० वर निकाल सुनावताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले की, जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्यायला हवा. परंतु लडाख केंद्रशासित प्रदेश कायम राहील. निवडणूक आयोगाने नवीन सीमारचनेच्या आधारे विधानसभा निवडणुका घ्याव्यात. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत याठिकाणी विधानसभा निवडणूक घ्यावी. जितकं शक्य असेल तितक्या लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जावा असं कोर्टाने सांगितले. 

तसेच संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता. जम्मू काश्मीरपासून लडाख स्वतंत्र्य करण्याचा सरकारचा निर्णय वैध आहे असं कोर्टाने म्हटलं. १६ दिवसांपासून सुरू असलेल्या घटनापीठाच्या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी एकूण २३ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात राजकीय नेते, सामाजिक संघटना, पत्रकार आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. 

सुप्रीम कोर्टाने काय काय म्हटलं?राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला आव्हान देणे वैध नाहीसंविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होतीसंविधान सभा भंग झाल्यानंतरही राष्ट्रपतींच्या आदेशावर कुठलीही बंधने नाहीतराष्ट्रपतींच्या अधिकाराचा गैरवापर झाला नाही त्यामुळे राज्याची सहमती घेण्याची आवश्यकता नाहीजम्मू काश्मीरातून लडाख केंद्र शासित बनवणे वैध जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा देऊन इथं निवडणूक घेण्यात यावी 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय