शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Amit Shah : संपूर्ण राज्याच्या मुद्द्यावर शाहंचं मोठं विधान, J&Kच्या परिसीमन आणि निवडणुकीसाठी सरकार वचनबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 21:41 IST

गृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे...

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर जम्मू-काश्मीरसंदर्भात आपला अजेंडा स्पष्ट केला आहे. भलेही तेथील नेते संपुष्टात आणलेले आर्टिकल 370 पुन्हा बहाल करण्याची मागणी करत असोत, पण सरकारने, ते राज्याच्या संपूर्ण विकासासाठी वचनबद्ध आहेत. तसेच, संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमन (सीमा ठरवणे अथवा सीमांकन) आणि निवडणुका आवश्यक आहेत, असे स्पष्ट केले आहे. (HM Amit Shah delimitation and elections of jammu and kashmir necessary for full statehood center is committed)

गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विट -केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी बैठकीनंतर ट्विट करत म्हटले आहे की, 'जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर आजची बैठक अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. सर्वांनीच लोकशाही आणि संविधानाप्रती आपली वचनबद्धता दर्शवली. तसेच, राज्यात लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यावर भर दिला. 

मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नाही -गृहमंत्र्यांच्या या ट्विटने स्पष्ट झाले आहे, की केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंदर्भात पुढे वाटचाल करायला सुरुवात केली आहे. मागे वळण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे, केंद्र सरकार तेथे सर्वप्रथम परिसीमनाचे कार्य करेल. यामुळे राज्यातील निवडणूक मतदारसंघाची पनर्रचना होईल. यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बदल केले जाऊ शकतात. यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका घेऊन नव्या विधानसभेची निर्मिती होईल. 

5 ऑगस्त 2019 रोजी कम्मू काश्मीरला लागू असलेल्या अनुच्छेद 370 मधील अनेक तरतुदी नष्ट केल्यानंतर जम्मू-काश्मीरला दिल्ली आणि पुदुचेरी प्रमाणे केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्यांच्या आपल्या विधानसभा आहेत. याच पद्धतीने तेथेही विधानसभेची स्थापना होईल. या सर्वपक्षीय बैठकीत आणि त्यानंतर मिडियासोबत बोलताना पीडीपी नेत्या महबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारकडे अनुच्छेद 370 पुन्हा बहाल करण्याची मागणी केली आहे. 

उमर अब्दुल्लांचं वक्तव्य -बैठकीनंतर उमर अब्दुल्ला म्हणाले, आम्ही बैठकीत म्हणालो, की 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने अनुच्छेत 370 हटविण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा आम्ही स्वीकार करणार नाही. आम्ही न्यायालयाच्या माध्यमाने 370 च्या मुद्द्यावर आमचा लढा लढू. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370