शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 07:00 IST

१ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

-विकास झाडेनवी दिल्ली : गेल्या ३२ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी थेट राजपथावरच ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा संकल्प सोडला आहे. १ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

सिंघू सीमेवर पंजाबी आणि जाट तर गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलचे शेतकरी, तसेच राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमारेषांवर हजारो शेतकरी गेल्या ३२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आम्ही आमचा अधिकार मिळवू, असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे, परंतु, सरकार आमचे ऐकणारच नसेल, तर येत्या प्रजासत्ताक दिनी कितीही विरोध झाला, तरी राजपथावरून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर धावतील, यासाठी रणनीती तयार केली जात आहे. 

दोन दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांनी आवाहन केल्याप्रमाणे हजारो शेतकरी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तरांचल, उत्तर प्रदेशमधून दिल्लीकडे निघाले आहेत. आतापर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू आहे. पुढेही उद्रेक होऊ नये, म्हणून नेते काळजी घेत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत रविवारपासून पंजाब व हरयाणामधील टोल नाके वसुलीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० डिसेंबर रोजी कुंडली द्रुतगती महामार्गावर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. नववर्षाच्या स्वागतासाठी दिल्ली व परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांसोबत लंगरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघू राय असो की, कॅनडाचा गायक जैजी. सामाजिक कार्यकर्ते किंवा वकिलांच्या संघटना, चित्रपटसृष्टीतील कलाकार सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. राजस्थानच्या शिक्षक संघाने आंदोलनाला पाठिंबा  दिला  आहे.

२९ डिसेंबरला शेतकरी सरकारशी चर्चा करणार 

संयुक्त किसान मोर्चाने कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांना २४ डिसेंबरच्या पत्राचे उत्तर पाठविले आहे. संघटनेने सरकार दिशाभूल करीत असल्याकडे लक्ष वेधले. आम्ही प्रत्येक चर्चेत तीनही कायदे मागे घेण्याची मागणी केली. आम्ही २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याबाबत सरकारने उचललेले पाऊल, एमएसपीबाबत कायदेशीर खात्री, एनसीआरमध्ये हवेच्या गुणवत्तेसाठी दंड करण्याच्या कायद्यातून वगळणे व वीज संशोधन विधेयक प्रारूपात बदल या मुद्द्यांवर चर्चा होईल.

पंजाबातून १५ हजार शेतकरी निघाले 

पंजाबच्या संगरूर येथून १५ हजार शेतकरी खनौरी सीमेकडे रवाना झाले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे शेतकरी रविवारी दाबवाली सीमेहून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सुरक्षा यंत्रणा चोख असल्याने त्यांना सीमेवर अडविले जाईल. शनिवारी गाझीपूर सीमेवर पंजाबातून दोन हजार शेतकरी पोहोचले.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा