शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

26 जानेवारीला राजपथावर धडक, शेतकऱ्यांचा इशारा; आंदोलन आणखी तीव्र करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 07:00 IST

१ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

-विकास झाडेनवी दिल्ली : गेल्या ३२ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असून, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी थेट राजपथावरच ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचा संकल्प सोडला आहे. १ जानेवारी रोजी नववर्ष दिनी ‘संयुक्त किसान मोर्चा’तर्फे याची घोषणा केली जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

सिंघू सीमेवर पंजाबी आणि जाट तर गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलचे शेतकरी, तसेच राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या सीमारेषांवर हजारो शेतकरी गेल्या ३२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आम्ही आमचा अधिकार मिळवू, असा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे, परंतु, सरकार आमचे ऐकणारच नसेल, तर येत्या प्रजासत्ताक दिनी कितीही विरोध झाला, तरी राजपथावरून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर धावतील, यासाठी रणनीती तयार केली जात आहे. 

दोन दिवसांपूर्वी शेतकरी नेत्यांनी आवाहन केल्याप्रमाणे हजारो शेतकरी पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तरांचल, उत्तर प्रदेशमधून दिल्लीकडे निघाले आहेत. आतापर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू आहे. पुढेही उद्रेक होऊ नये, म्हणून नेते काळजी घेत आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत रविवारपासून पंजाब व हरयाणामधील टोल नाके वसुलीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३० डिसेंबर रोजी कुंडली द्रुतगती महामार्गावर ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल. नववर्षाच्या स्वागतासाठी दिल्ली व परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांसोबत लंगरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघू राय असो की, कॅनडाचा गायक जैजी. सामाजिक कार्यकर्ते किंवा वकिलांच्या संघटना, चित्रपटसृष्टीतील कलाकार सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. राजस्थानच्या शिक्षक संघाने आंदोलनाला पाठिंबा  दिला  आहे.

२९ डिसेंबरला शेतकरी सरकारशी चर्चा करणार 

संयुक्त किसान मोर्चाने कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांना २४ डिसेंबरच्या पत्राचे उत्तर पाठविले आहे. संघटनेने सरकार दिशाभूल करीत असल्याकडे लक्ष वेधले. आम्ही प्रत्येक चर्चेत तीनही कायदे मागे घेण्याची मागणी केली. आम्ही २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याबाबत सरकारने उचललेले पाऊल, एमएसपीबाबत कायदेशीर खात्री, एनसीआरमध्ये हवेच्या गुणवत्तेसाठी दंड करण्याच्या कायद्यातून वगळणे व वीज संशोधन विधेयक प्रारूपात बदल या मुद्द्यांवर चर्चा होईल.

पंजाबातून १५ हजार शेतकरी निघाले 

पंजाबच्या संगरूर येथून १५ हजार शेतकरी खनौरी सीमेकडे रवाना झाले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे शेतकरी रविवारी दाबवाली सीमेहून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, सुरक्षा यंत्रणा चोख असल्याने त्यांना सीमेवर अडविले जाईल. शनिवारी गाझीपूर सीमेवर पंजाबातून दोन हजार शेतकरी पोहोचले.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा