शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

इतिहासाची पाने: देशातील पहिल्या निवडणुकीपूर्वीची हंगामी लोकसभा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 04:42 IST

राष्ट्रपती पद निर्माण करण्यात आले. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. पुढे ते दोन टर्म (१० वर्षे) राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतच लोकसभेची पहिली निवडणूक झाली.

- वसंत भोसले

लोकसभेची पहिली निवडणूक झाल्यानंतर १७ एप्रिल १९५२ रोजी लोकसभा गठीत करण्यात आली. तत्पूर्वी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात होते. मात्र, त्यासाठी हंगामी लोकसभा स्थापन करण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत एम. एन. रॉय यांनी १९३४ मध्ये स्वतंत्र भारताची मागणी करताना घटना समिती स्थापन करावी, अशी प्रथम मागणी केली होती. भारतीय काँग्रेसने पुढील वर्षी ठराव करून या मागणीला अधिकृत स्वरूप दिले.पुढे १९४० मध्ये ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली. मात्र, ती दुसऱ्या महायुद्धाच्या वातावरणात कागदावरच राहिली. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय झाल्यावर घटना समिती स्थापन करण्यासाठी निवडणुका झाल्या. त्यावर काँग्रेस पक्षाचे २०८, मुस्लीम लीगचे ७३, इतर पक्षांचे १५ आणि संस्थानिकांचे ९३ सदस्य निवडले गेले. मुस्लीम लीगने स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीवरून समित्यांच्या बैठकांवर बहिष्कार घातला. पाकिस्तानची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण होताच त्यांनी स्वतंत्र घटना समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या सदस्यांव्यतिरिक्त आणि काही संस्थानिकांचे खालसाकरण झाल्यावर २९९ सदस्यांच्या समितीने स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याचे कार्य सुरू केले. हेच सदस्य हंगामी लोकसभेचे सदस्य राहिले. भारतीय घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली आणि प्रत्यक्षात प्रजासत्ताक राज्याची उद्घोषणा २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. घटना समितीचे सर्व सदस्य राज्यघटनेतील तरतुदींनुसार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत हंगामी सदस्य म्हणून कार्य करू लागले. लोकसभेची निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. त्याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. आयोगाने सुमारे दोन वर्षे तयारी करून निवडणूक घेण्याची घोषणा केली. लोकसभेची ही पहिली निवडणूक होती. निवडणूक आयोगाचे आयुक्त सुकुमार सेन होते.मतदार याद्या तयार करणे, मतदान केंद्रे तयार करणे, निवडणूक चिन्हे तयार करणे, उमेदवारी अर्ज तयार करणे, आदी प्रचंड काम निवडणूक आयोगाने दोन वर्षे केले. ही निवडणूक २५ आॅक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या दरम्यान जवळपास चार महिने चालली होती. तत्पूर्वीची पाच वर्षे भारताची राज्यघटना बनविणे, निवडणूक आयोगाची स्थापना करणे, भाषावार प्रांतरचना करणे, संस्थाने खालसा करणे, अशा अनेक घटना, घडामोडीने देश तयार होत होता एका नव्या लोकशाहीप्रधान देशाच्या स्वागतासाठी. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात सर्व विचारांचे, पक्षांचे आणि विविध गटाचे सदस्य होते. त्या सर्वांना घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू देशाचा कारभार पाहत होते. घटना समितीच्या सदस्यांबरोबरच सी. राजगोपालचारी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पहिले भारतीय आणि शेवटचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटनकडून २१ जून १९४८ रोजी सूत्रे स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी देश प्रजासत्ताक म्हणून घोषित होताच हे पद रद्द करण्यात आले. 

 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू