शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

इतिहासाची पाने: देशातील पहिल्या निवडणुकीपूर्वीची हंगामी लोकसभा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 04:42 IST

राष्ट्रपती पद निर्माण करण्यात आले. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. पुढे ते दोन टर्म (१० वर्षे) राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतच लोकसभेची पहिली निवडणूक झाली.

- वसंत भोसले

लोकसभेची पहिली निवडणूक झाल्यानंतर १७ एप्रिल १९५२ रोजी लोकसभा गठीत करण्यात आली. तत्पूर्वी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात होते. मात्र, त्यासाठी हंगामी लोकसभा स्थापन करण्यात आली होती. ज्येष्ठ विचारवंत एम. एन. रॉय यांनी १९३४ मध्ये स्वतंत्र भारताची मागणी करताना घटना समिती स्थापन करावी, अशी प्रथम मागणी केली होती. भारतीय काँग्रेसने पुढील वर्षी ठराव करून या मागणीला अधिकृत स्वरूप दिले.पुढे १९४० मध्ये ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली. मात्र, ती दुसऱ्या महायुद्धाच्या वातावरणात कागदावरच राहिली. भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय झाल्यावर घटना समिती स्थापन करण्यासाठी निवडणुका झाल्या. त्यावर काँग्रेस पक्षाचे २०८, मुस्लीम लीगचे ७३, इतर पक्षांचे १५ आणि संस्थानिकांचे ९३ सदस्य निवडले गेले. मुस्लीम लीगने स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीवरून समित्यांच्या बैठकांवर बहिष्कार घातला. पाकिस्तानची निर्मिती होण्याची शक्यता निर्माण होताच त्यांनी स्वतंत्र घटना समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्या सदस्यांव्यतिरिक्त आणि काही संस्थानिकांचे खालसाकरण झाल्यावर २९९ सदस्यांच्या समितीने स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याचे कार्य सुरू केले. हेच सदस्य हंगामी लोकसभेचे सदस्य राहिले. भारतीय घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आली आणि प्रत्यक्षात प्रजासत्ताक राज्याची उद्घोषणा २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. घटना समितीचे सर्व सदस्य राज्यघटनेतील तरतुदींनुसार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत हंगामी सदस्य म्हणून कार्य करू लागले. लोकसभेची निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. त्याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. आयोगाने सुमारे दोन वर्षे तयारी करून निवडणूक घेण्याची घोषणा केली. लोकसभेची ही पहिली निवडणूक होती. निवडणूक आयोगाचे आयुक्त सुकुमार सेन होते.मतदार याद्या तयार करणे, मतदान केंद्रे तयार करणे, निवडणूक चिन्हे तयार करणे, उमेदवारी अर्ज तयार करणे, आदी प्रचंड काम निवडणूक आयोगाने दोन वर्षे केले. ही निवडणूक २५ आॅक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या दरम्यान जवळपास चार महिने चालली होती. तत्पूर्वीची पाच वर्षे भारताची राज्यघटना बनविणे, निवडणूक आयोगाची स्थापना करणे, भाषावार प्रांतरचना करणे, संस्थाने खालसा करणे, अशा अनेक घटना, घडामोडीने देश तयार होत होता एका नव्या लोकशाहीप्रधान देशाच्या स्वागतासाठी. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात सर्व विचारांचे, पक्षांचे आणि विविध गटाचे सदस्य होते. त्या सर्वांना घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू देशाचा कारभार पाहत होते. घटना समितीच्या सदस्यांबरोबरच सी. राजगोपालचारी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पहिले भारतीय आणि शेवटचे व्हाईसरॉय म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटनकडून २१ जून १९४८ रोजी सूत्रे स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी देश प्रजासत्ताक म्हणून घोषित होताच हे पद रद्द करण्यात आले. 

 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू