शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

History of Air Crashes in India : हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचे निधन; यापूर्वीही 'या' दिग्गजांचा हवाईप्रवास ठरला अखेरचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 20:03 IST

History of Air Crashes in India : विमान अपघातात एखादे मोठे व्यक्तिमत्त्व गमवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे विमान अपघातात निधन झाले आहे.

History of Air Crashes in India: तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी (08 डिसेंबर) लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. या अपघातात बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचे निधन झाले. या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

दरम्यान, विमान अपघातात एखादे मोठे व्यक्तिमत्त्व गमवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. विमान अपघातात कोणत्या बड्या राजकारण्यांना आपला जीव गमवावा लागला? त्याबद्दल जाणून घेऊया...

वायएस राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वायएस राजशेखर रेड्डी यांचे 2009 मध्ये रुद्रकोंडा हिल येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. रेड्डी हे काँग्रेसमधील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक होते आणि त्यांनी 2009 मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्यास मदत केली होती.

माधवराव शिंदेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे यांचा सप्टेंबर 2001 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. माधवराव शिंदे आणि इतर सहा जणांना घेऊन जाणारे खाजगी विमान उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्याच्या बाहेरील भागात कोसळले होते.

जीएमसी बालयोगीजीएमसी बालयोगी, जे लोकसभेचे सभापती होते. 03 मार्च 2002 रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूर येथे हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे निधन झाले. जीएमसी बालयोगी यांची 1998 मध्ये लोकसभेचे सभापती म्हणून निवड झाली होती. 1999 मध्ये ते पुन्हा 13 व्या लोकसभेचे सभापती बनले. ते लोकसभेचे पहिले दलित सभापती होते.

मोहन कुमारमंगलम1973 मध्ये नवी दिल्लीजवळ इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपघातात काँग्रेस नेते मोहन कुमारमंगलम यांचा मृत्यू झाला. मोहन कुमारमंगलम हे आधी कम्युनिस्ट पार्टीमध्ये होते, पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सी संगमासप्टेंबर 2004 मध्ये केंद्रीय मंत्री आणि मेघालयचे समुदाय विकास मंत्री सी संगमा यांचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. संगमा पवन हंस नावाच्या हेलिकॉप्टरने गुवाहाटीहून शिलाँगला जात होते.

ओम प्रकाश जिंदल31 मार्च 2005 रोजी उत्तर प्रदेशातील सहारनपूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात हरयाणाचे तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि प्रसिद्ध उद्योगपती ओम प्रकाश जिंदाल यांचा मृत्यू झाला होता. जिंदाल 1996 ते 1997 या काळात अन्न, नागरी पुरवठा आणि सार्वजनिक वितरण समितीचे सदस्य होते.

डेरा नाटुंगअरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री डेरा नाटुंग यांचे 2001 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले होते. राज्यात EMRS (एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल) मॉडेल सुरू करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

सुरेंद्र नाथ विमान अपघातात पंजाबचे राज्यपाल सुरेंद्र नाथ आणि त्यांच्या कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला होता. खराब हवामानात सरकारी विमान 09 जुलै 1994 रोजी हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतांवर कोसळले. त्यावेळी सुरेंद्र नाथ हिमाचलचे कार्यवाहक राज्यपाल होते.

संजय गांधीमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा लहान मुलगा संजय गांधी यांचा जून 1980 मध्ये दिल्लीत विमान अपघातात मृत्यू झाला होता.

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना