शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त"; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 11:23 IST

BJP MLA Raghvendra Pratap Singh : भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. "जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चे रक्त आहे" असं विधान भाजपाचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह (BJP MLA Raghvendra Pratap Singh) यांनी केलं आहे. राघवेंद्र सिंह हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

"मी पाच दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं. परंतु ते दुसऱ्या संदर्भात होतं आणि कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता" असं यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच व्हिडिओमध्ये आमदारांनी काही अपशब्द वापरल्याचं ऐकू येत आहेत. त्यावर त्यांनी "मला सांगा, कोणी मुस्लिम मला मत देईल का? तेव्हा लक्षात ठेवा की या गावातील हिंदूंनी माझ्याऐवजी दुसऱ्याचे समर्थन केले तर त्यांच्यामध्ये 'मियां'चे रक्त आहे. ते देशद्रोही आहेत. इतके अत्याचार करूनही जर हिंदू तिकडे गेला तर त्याने लोकांसमोर आपले तोंड दाखवू नये" असं म्हटलं आहे.

"हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी प्रयत्न कराल तर मी तुम्हाला बर्बाद करून सोडेन"

"…आणि पुन्हा एकदा इशारा देऊन तुम्हाला समजले नाही, तर यावेळी मी सांगेन की राघवेंद्र सिंह कोण आहे. कारण तुम्ही माझा विश्वासघात केला तर चालेल, मी अपमान सहन करून घेईन. पण जर तुम्ही आमच्या हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी प्रयत्न कराल तर मी तुम्हाला बर्बाद करून सोडेन" असं राघवेंद्र प्रताप सिंह यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

"कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता"

सिंह यांनी त्यांच्या विधानाची इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कबुली दिली. पुढे स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, "मी त्या गोष्टी बोलल्या आहेत, मी नाकारत नाही. पण मी त्या सर्व गोष्टी दुसर्‍या संदर्भात बोललो होतो आणि भूतकाळाशी तुलना करत होतो. कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता. डोमरियागंजमध्ये सुमारे 1.73 लाख मुस्लिम मतदार आहेत, अशा ठिकाणी अशी धमकी देऊन कोणी निवडणूक जिंकू शकते का?" असंही म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२PoliticsराजकारणBJPभाजपाHinduहिंदू