शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

"जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चं रक्त"; भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 11:23 IST

BJP MLA Raghvendra Pratap Singh : भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका आमदाराने वादग्रस्त विधान केलं आहे. "जे हिंदू मला मत देणार नाहीत, त्यांच्यात 'मियां'चे रक्त आहे" असं विधान भाजपाचे आमदार राघवेंद्र प्रताप सिंह (BJP MLA Raghvendra Pratap Singh) यांनी केलं आहे. राघवेंद्र सिंह हे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवत आहेत. एका प्रचारसभेत त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

"मी पाच दिवसांपूर्वी हे विधान केलं होतं. परंतु ते दुसऱ्या संदर्भात होतं आणि कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता" असं यासंदर्भात इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच व्हिडिओमध्ये आमदारांनी काही अपशब्द वापरल्याचं ऐकू येत आहेत. त्यावर त्यांनी "मला सांगा, कोणी मुस्लिम मला मत देईल का? तेव्हा लक्षात ठेवा की या गावातील हिंदूंनी माझ्याऐवजी दुसऱ्याचे समर्थन केले तर त्यांच्यामध्ये 'मियां'चे रक्त आहे. ते देशद्रोही आहेत. इतके अत्याचार करूनही जर हिंदू तिकडे गेला तर त्याने लोकांसमोर आपले तोंड दाखवू नये" असं म्हटलं आहे.

"हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी प्रयत्न कराल तर मी तुम्हाला बर्बाद करून सोडेन"

"…आणि पुन्हा एकदा इशारा देऊन तुम्हाला समजले नाही, तर यावेळी मी सांगेन की राघवेंद्र सिंह कोण आहे. कारण तुम्ही माझा विश्वासघात केला तर चालेल, मी अपमान सहन करून घेईन. पण जर तुम्ही आमच्या हिंदू समाजाला अपमानित करण्यासाठी प्रयत्न कराल तर मी तुम्हाला बर्बाद करून सोडेन" असं राघवेंद्र प्रताप सिंह यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

"कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता"

सिंह यांनी त्यांच्या विधानाची इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कबुली दिली. पुढे स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, "मी त्या गोष्टी बोलल्या आहेत, मी नाकारत नाही. पण मी त्या सर्व गोष्टी दुसर्‍या संदर्भात बोललो होतो आणि भूतकाळाशी तुलना करत होतो. कोणालाही धमकावण्याचा माझा हेतू नव्हता. डोमरियागंजमध्ये सुमारे 1.73 लाख मुस्लिम मतदार आहेत, अशा ठिकाणी अशी धमकी देऊन कोणी निवडणूक जिंकू शकते का?" असंही म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२PoliticsराजकारणBJPभाजपाHinduहिंदू