शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

'हिंदूंना मुस्लिम-ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्यांपासून जास्त धोका आहे'- CM हिमंता बिस्वा सरमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 17:24 IST

'भारत 5000 वर्षे जुनी सभ्यता आहे. हिंदू धर्म नष्ट करू, अशी शपथ घेतलेला औरंगजेब संपला, पण हिंदू धर्म नष्ट करू शकला नाही.'

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी  काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. 'हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्या विचारसरणीच्या लोकांपासून धोका आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हिमंता पुढे म्हणतात, मी काही लोकांचे भाषण ऐकतो, त्यांना वाटते की, आपण संविधान स्वीकारल्यापासून भारत वर्ष सुरू झाले आहे, परंतु तसे अजिबात नाही. भारत ही 5000 वर्षे जुनी संस्कृती आहे. हिंदू धर्म नष्ट करू, अशी शपथ घेतलेला औरंगजेब हिंदू धर्म नष्ट करू शकला नाही. पण तो स्वतःच संपला. जर राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना हिंदू धर्म नष्ट होईल, असे वाटत असेल, तर मी म्हणेन तुमचा नाश होईल, हिंदू धर्म कधीच संपणार नाही.

मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून हिंदूंना धोका नाहीडाव्या आणि उदारमतवादी लोकांनी या देशाला विळखा घातला होता. अशा लोकांना पद्मश्री मिळाले, जे विशेषतः हिंदूंच्या विरोधात बोलायचे. देश सावरणार नाही, असे 2014 पर्यंत वाटायचे. अनेक घोटाळे झाले, हिंदूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यावेळी हिंदू बोलू नका, धर्मनिरपेक्ष बोला, असे सांगितले गेले. देशाच्या पंतप्रधानांनी तर देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असेल, असे म्हटले होते. खर तर हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून धोका नाही, तर हिंदूंना धोका आपल्या समाजापासूनच आहे.

आपल्यासाठी सर्वात मोठा धोका डाव्या आणि उदारमतवादी लोकांकडून आहे. कोणत्याही मुस्लिमाने भारताच्या इतिहासाची पुस्तके बदलली नाहीत. रोमिला थापरसारख्या व्यक्तीने जेएनयूमध्ये बसून आपल्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण केले. जेएनयूमध्ये बसून ज्यांनी आपला समाज आणि देश उद्ध्वस्त केला ,ते दुसरे कोणीही नसून हिंदू आहेत.

आपण असा समाज निर्माण केला पाहिजे जिथे भविष्यात डावे किंवा उदारमतवादी जन्माला येणार नाहीत. म्हणूनच मी म्हणतो की आपण एकजूट राहायला हवे. आपण एकत्र राहिलो तर कोणतीही ममता बॅनर्जी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही. जोपर्यंत भारत हिंदूंना सुरक्षित ठेवेल तोपर्यंत इतर धर्मही सुरक्षित राहतील, यावर माझा नेहमीच विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाAssamआसामHinduहिंदूMuslimमुस्लीम