शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदूंना मुस्लिम-ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्यांपासून जास्त धोका आहे'- CM हिमंता बिस्वा सरमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 17:24 IST

'भारत 5000 वर्षे जुनी सभ्यता आहे. हिंदू धर्म नष्ट करू, अशी शपथ घेतलेला औरंगजेब संपला, पण हिंदू धर्म नष्ट करू शकला नाही.'

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी  काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. 'हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून नाही, तर डाव्या विचारसरणीच्या लोकांपासून धोका आहे,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हिमंता पुढे म्हणतात, मी काही लोकांचे भाषण ऐकतो, त्यांना वाटते की, आपण संविधान स्वीकारल्यापासून भारत वर्ष सुरू झाले आहे, परंतु तसे अजिबात नाही. भारत ही 5000 वर्षे जुनी संस्कृती आहे. हिंदू धर्म नष्ट करू, अशी शपथ घेतलेला औरंगजेब हिंदू धर्म नष्ट करू शकला नाही. पण तो स्वतःच संपला. जर राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना हिंदू धर्म नष्ट होईल, असे वाटत असेल, तर मी म्हणेन तुमचा नाश होईल, हिंदू धर्म कधीच संपणार नाही.

मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून हिंदूंना धोका नाहीडाव्या आणि उदारमतवादी लोकांनी या देशाला विळखा घातला होता. अशा लोकांना पद्मश्री मिळाले, जे विशेषतः हिंदूंच्या विरोधात बोलायचे. देश सावरणार नाही, असे 2014 पर्यंत वाटायचे. अनेक घोटाळे झाले, हिंदूंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यावेळी हिंदू बोलू नका, धर्मनिरपेक्ष बोला, असे सांगितले गेले. देशाच्या पंतप्रधानांनी तर देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असेल, असे म्हटले होते. खर तर हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चनांपासून धोका नाही, तर हिंदूंना धोका आपल्या समाजापासूनच आहे.

आपल्यासाठी सर्वात मोठा धोका डाव्या आणि उदारमतवादी लोकांकडून आहे. कोणत्याही मुस्लिमाने भारताच्या इतिहासाची पुस्तके बदलली नाहीत. रोमिला थापरसारख्या व्यक्तीने जेएनयूमध्ये बसून आपल्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण केले. जेएनयूमध्ये बसून ज्यांनी आपला समाज आणि देश उद्ध्वस्त केला ,ते दुसरे कोणीही नसून हिंदू आहेत.

आपण असा समाज निर्माण केला पाहिजे जिथे भविष्यात डावे किंवा उदारमतवादी जन्माला येणार नाहीत. म्हणूनच मी म्हणतो की आपण एकजूट राहायला हवे. आपण एकत्र राहिलो तर कोणतीही ममता बॅनर्जी आपल्यासमोर उभी राहू शकत नाही. जोपर्यंत भारत हिंदूंना सुरक्षित ठेवेल तोपर्यंत इतर धर्मही सुरक्षित राहतील, यावर माझा नेहमीच विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाAssamआसामHinduहिंदूMuslimमुस्लीम