शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 21:48 IST

आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे

कोची - हिंदुच्या मंदिरात मुस्लिमांना प्रवेश मिळतो, पण मुस्लीम समुदायाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीत हिंदुना प्रवेश दिला जात नाही, असे अनेकदा आपण ऐकले असेल. मात्र, तुमचा हा समज खोटा ठरवणारी आणि जातीभेदीच्या भिंती तोडून टाकणारी घटना केरळमध्ये घडली आहे.  येथे अलपुझा जिल्ह्याच्या कायमकुलम येथील मुस्लीम समाजाने हिंदू तरुणीचं लग्न लावून देत एकतेचा संदेश दिला. विशेष म्हणजे प्राचीन महत्त्व असलेल्या मशिदीत हे लग्न लावून देण्यात आलं आहे.  

केरळमधील या धार्मिक आणि जातीय सलोख्याचं केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही कौतुक केलंय. केरळमधल्या एकतेचं हे प्रतिक असल्याचं पिनराई यांनी म्हटलंय. आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे. मुलगी आशाच्या आईने मुस्लीम धर्माच्या नागरिकांकडे या लग्नासाठी मदत मागितली होती. आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने बिंदू यांनी मुस्लीम बांधवांकडे मदत मागितीहोती. त्यानंतर, मशिद समितीने मुलीच्या लग्नासाठी मशिद उपलब्ध करुन दिली. 

विशेष म्हणजे, लग्नासाठी 19 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांचा मुहूर्त काढण्यात आला होता. त्यानुसार, मशिदीच्या वतीने पत्रिका छापून वाटण्यात आल्या. मशिद समितीने मुलीला 10 तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. हे पूर्ण लग्न हिंदू पद्धतीने पार पडलं. या लग्नासाठी 1 हजार पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मुलीची आई बिंदू यांनी मशिद समितीचे आभार मानले आहेत. सध्या, केरळमध्ये हे लग्न चर्चेचा विषय ठरले आहे. 

विवाह झालेल्या तरुणीचं नाव आशा आहे. आशाच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी ह्रदयविकाराने मृत्यू झाला होता. आई बिंदू यांच्यासमोर मुलीचं लग्न कसं करायचं याची चिंता लागली होती. पतीच्या निधनानंतर असहाय्य झालेल्या बिंदू आपल्या तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी मशिदीच्या व्यवस्थानकडे यासाठी मदत मागितली. यावर त्यांनी तात्काळ मदतीसाठी तयारी दर्शवली. 

टॅग्स :marriageलग्नKeralaकेरळChief Ministerमुख्यमंत्रीHinduहिंदूMuslimमुस्लीम