शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

हिंदी ही केवळ शूद्रांची अन् अविकसित राज्यांची भाषा; द्रमुक खासदाराच्या विधानानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:01 IST

द्रमुक खासदार टीकेएस एलंगोवन यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.  

देशात हिंदी भाषेवरून कायम वाद रंगल्याचं चित्र आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचा दावा उत्तरेकडील लोक करतात. भारतात बहुतांश बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदी ओळखली जाते. परंतु याच हिंदीवर दक्षिणेकडे मोठं राजकारण होतं. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या मातृभाषेवर कट्टर असणाऱ्या राज्यात हिंदी भाषेला नगण्य स्थान आहे. तर महाराष्ट्रातही हिंदी भाषेला दुय्यम स्थान दिले जाते. मराठीचा आग्रह धरणाऱ्या नेत्यांची ठाम भूमिका आहे की हिंदी राष्ट्रभाषा नाही. आता भाषावादाच्या या स्थितीत द्रमुक खासदार टीकेएस एलंगोवन यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

खासदार टीकेएस एलंगोवन(DMK MP TKS Elangovan) म्हणाले की, हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा आहे. इतकेच नाही तर हिंदी केवळ शूद्रांची भाषा आहे. हिंदी ही फक्त अविकसित राज्य जसे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात मातृभाषा आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब पाहा. हे सर्व विकसित राज्य नाही का? हिंदी ही या राज्यातील लोकांची मातृभाषा नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

तर हिंदी आपल्याला शुद्रांमध्ये बदलेल. हिंदी आपल्यासाठी चांगली नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत संसदीय राजभाषा समितीच्या ३७ व्या बैठकीत हिंदीला इंग्लिशसाठी पर्याय म्हणून स्वीकारलं गेले पाहिजे. तिला स्थानिक भाषेला पर्याय म्हणून पाहायला नको असं विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून दक्षिणेकडे अनेकांनी विरोध केला होता. 

"हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकतायेत..."अलीकडेच तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले होते. इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे, असे ते म्हणाले. तसेच, हिंदी ही ऐच्छिक असली पाहिजे, मात्र अनिवार्य नसावी असे सांगत हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकत असल्याचा दावा पोनमुडी यांनी केला होता.

काय म्हणाले होते अमित शाह?इतर भाषिक राज्यांतील नागरिक जेव्हा एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा तो संवाद भारतीय भाषेत व्हायला हवा. इतकी हिंदी भाषा समृद्ध व्हायला हवी असं आवाहन अमित शाह यांनी केलं होतं. हिंदी ही राजभाषा असून देशाच्या एकात्मतेचा एक महत्त्वाचा भाग बनवण्याची वेळ आली आहे. स्थानिक भाषेतील राज्यांनी इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदीचा स्वीकार केला पाहिजे असं त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :hindiहिंदीAmit Shahअमित शाह