शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तांतर होणार का ? भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 09:22 IST

दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणणारे हिमाचल प्रदेशचे मतदार यावेळेसही सत्तापालट घडवून भाजपाच्या पारड्यामध्ये आपल्या मतांचे वजन टाकणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबई - दर पाच वर्षांनी सत्तापालट घडवून आणणारे हिमाचल प्रदेशचे मतदार यावेळेसही सत्तापालट घडवून भाजपाच्या पारड्यामध्ये आपल्या मतांचे वजन टाकणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि सध्याचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यासाठी जितकी महत्त्वाची आहे तितकीच भाजपासाठी आहे. या निवडणुकीच्या निकालाचा थेट संबंध केंद्र सरकारच्या कामाशी आणि पाठोपाठ होत असलेल्या गुजरात निवडणुकीशी लावला जाणार असल्यामुळे या दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.

१९६७ पर्यंत या राज्यात केवळ काँग्रेसचीच एकहाती सत्ता होती. १९६६ साली पंजाबमधील काही प्रदेश राज्याला जोडल्यानंतर काँग्रेसला ६० पैकी केवळ ३४ जागा जिंकता आल्या होत्या. पण काँग्रेसला खरा धक्का बसला तो आणीबाणीच्या काळामध्ये. १९८५ पासून राज्यामध्ये जनतेने एकदा काँग्रेस आणि एकदा भाजपा असा आलटून पालटून कौल दिला आहे. अधिक स्पष्ट करायचे झाले तर एकदा वीरभद्र सिंह आणि एकदा प्रेमकुमार धूमल असे म्हणता येईल. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतसिंग परमार यांच्या १८ वर्षांच्या कार्यकाळानंतर वीरभद्र सिंह यांना सर्वाधिक काळ म्हणजे २२ वर्षे मुख्यमंत्रिपद मिळाले आहे तर भाजपाच्या धूमल यांना १० व त्यापाठोपाठ शांताकुमार यांना ५ वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहता आले.

बेहिशेबी मालमत्तेची प्रकरणे, २०१४ ची मोदी लाट, मतदारांचे पाच वर्षांनी दुस-या पक्षाला निवडणे यासर्व मुद्यांमधून काँग्रेसचे वीरभद्र सिंग पुन्हा यशस्वी होणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे हिमाचलमधील नेते आनंद शर्मा यांच्या प्रचाराच्या सभा आयोजित केल्या तर भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, जगतप्रकाश नड्डा , शांताकुमार, अनुराग ठाकूर अशी फौज प्रचारात उतरवली.

९ तारखेस सर्व ६८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून १८ तारखेस जनतेचा कौल स्पष्ट होईल. हिमाचल प्रदेशचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला मतदारांचे पुरष मतदारांइतकेच जवळजवळ समप्रमाण या राज्याच आहे. काही मतदारसंघात महिलांचे प्रमाण अधिक आहे. चंबा, लाहूल आणि स्पीती, किनौर, कांग्रा, कुलू, शिमला, मंडी, हामिरपूर, उना, सोलन, सिरमौर असे राज्याचे प्रशासकीय विभाग आहेत.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी