शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

काँग्रेससाठी गुड न्यूज, हिमाचलमध्ये 'ऑपरेशन लोटस' फेल; विक्रमादित्य यांनी मागे घेतला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 20:55 IST

दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा मागे घेतला आहे.

Himachal Pradesh Political Crisis:हिमाचल प्रदेशात काल, म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी केली, ज्यामुळे भाजपाचा उमेदवार विजयी झाला. यानंतर, दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले होते. भाजपावाले सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते. पण, आता काँग्रेससाठी एक चांगली बातमी आली आहे. 

राजीनामा परत घेतलादिवसभराच्या राजकीय गोंधळानंतर काँग्रेस सरकारसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. राज्य सरकारमधील पीडब्यूडी मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. याबाबत विक्रमादित्य म्हणाले, "संघटना मजबूत करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. पक्षाच्या व्यापक हितासाठी आणि एकात्मतेसाठी मी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. आता मलाही हे प्रकरण आणखी वाढवण्यात रस नाही. आता आमच्या सरकारला कोणताही धोका नाही," असे ते मीडियाशी बोलताना म्हणाले. 

बंडखोरांची हकालपट्टी होणार?पक्षविरोधी काम केल्यामुळे त्या सहा बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याबात काँग्रेसचे मुख्य व्हीप हर्षवर्धन चौहान म्हणाले, “आम्ही सहा बंडखोर आमदारांची हकालपट्टी करण्याची मागणी करणारी याचिका सभापतींकडे सादर केली. आज दुपारी एक वाजता सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवाद सभापतींसमोर मांडले आणि आम्हाला आशा आहे की सभापती त्यावर लवकरच निर्णय घेतील.”

दिवसभरात काय घडले?विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा जाहीर करताना त्यांनी आपल्या वडिलांची तुलना शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्याशी केली. पत्रकार परिषदेत वडिलांची आठवणीत विक्रमादित्य भावूक झाले. संपूर्ण निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर लढवली गेली. ज्या व्यक्तीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर 2 यार्ड जमीन देण्यात आली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliticsराजकारण