शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

काँग्रेससाठी गुड न्यूज, हिमाचलमध्ये 'ऑपरेशन लोटस' फेल; विक्रमादित्य यांनी मागे घेतला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 20:55 IST

दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा मागे घेतला आहे.

Himachal Pradesh Political Crisis:हिमाचल प्रदेशात काल, म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी केली, ज्यामुळे भाजपाचा उमेदवार विजयी झाला. यानंतर, दिवंगत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, ज्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले होते. भाजपावाले सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत होते. पण, आता काँग्रेससाठी एक चांगली बातमी आली आहे. 

राजीनामा परत घेतलादिवसभराच्या राजकीय गोंधळानंतर काँग्रेस सरकारसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. राज्य सरकारमधील पीडब्यूडी मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. याबाबत विक्रमादित्य म्हणाले, "संघटना मजबूत करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. पक्षाच्या व्यापक हितासाठी आणि एकात्मतेसाठी मी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. आता मलाही हे प्रकरण आणखी वाढवण्यात रस नाही. आता आमच्या सरकारला कोणताही धोका नाही," असे ते मीडियाशी बोलताना म्हणाले. 

बंडखोरांची हकालपट्टी होणार?पक्षविरोधी काम केल्यामुळे त्या सहा बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याबात काँग्रेसचे मुख्य व्हीप हर्षवर्धन चौहान म्हणाले, “आम्ही सहा बंडखोर आमदारांची हकालपट्टी करण्याची मागणी करणारी याचिका सभापतींकडे सादर केली. आज दुपारी एक वाजता सुनावणी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवाद सभापतींसमोर मांडले आणि आम्हाला आशा आहे की सभापती त्यावर लवकरच निर्णय घेतील.”

दिवसभरात काय घडले?विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा जाहीर करताना त्यांनी आपल्या वडिलांची तुलना शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्याशी केली. पत्रकार परिषदेत वडिलांची आठवणीत विक्रमादित्य भावूक झाले. संपूर्ण निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर लढवली गेली. ज्या व्यक्तीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर 2 यार्ड जमीन देण्यात आली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले होते. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliticsराजकारण