शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

"संपूर्ण गाव डोळ्यासमोर वाहून गेलं, फक्त माझं घर उरलं पण..."; मन हेलावून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 12:49 IST

शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे. 

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेने लोकांच्या मनावर खोलवर जखमा झाल्या आहेत. काहींनी आपलं कुटुंब गमावलं आहे, तर काहींचं अख्ख गाव वाहून गेलं आहे. शिमला जिल्ह्यातील रामपूरच्या समेज येथे अशीच एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. अनिता देवी यांची हृदयद्रावक घटना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत आहे. 

अनिता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण गावात आता फक्त माझंच घर राहिलं आहे. बाकी सर्व माझ्या डोळ्यासमोर वाहून गेलं. बुधवारी रात्री मी माझ्या कुटुंबासोबत झोपले होते. ढगांचा गडगडाट झाला आणि घर हादरलं. काही लोक धावत आमच्या घराकडे आले. बाहेर पाहिलं तर संपूर्ण गाव वाहून गेल्याचे दिसलं. आम्ही घरातून निघालो आणि गावातील भगवती काली माता मंदिरात गेलो आणि संपूर्ण रात्र तिथेच घालवली.

समेज गावातील बक्शी राम यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील १४ ते १५ जण पुरात वाहून गेले आहेत. रात्री दोन वाजता घटनेची माहिती मिळाली. समेजमध्ये पूर आला होता, मी रामपूरला होतो. त्यामुळेच मी वाचलो आहे. पहाटे चार वाजता येथे पोहोचलो तेव्हा सगळं संपलं होतं. आता मी माझ्या कुटुंबातील सदस्यांचा शोध घेत आहे. अजूनही मदतकार्य सुरू आहे. 

बुधवारी रात्री राज्यातील कुल्लू, मंडी आणि शिमला या तीन जिल्ह्यांमध्ये ढगफुटी झाली होती. त्यानंतर अचानक पूर आला. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या तीन जिल्ह्यांत ढगफुटीमुळे आलेल्या पुरानंतर ४९ लोक बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी बचाव कर्मचाऱ्यांनी ड्रोन तैनात केले आहेत. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Himachal Pradesh Rainsहिमाचल प्रदेश पूरfloodपूरRainपाऊस