शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Himachal Byelection Result: ७० वर्षाची प्रथा मोडली; मंडीमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं इतिहास रचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 09:37 IST

१९९६ मध्ये जेव्हा पंडित सुखराम यांचा विजय झाला त्यावेळी अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. परंतु अवघे १३ दिवस हे सरकार चाललं.

मंडी – हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा पोटनिवडणुकीत ७० वर्षाची प्रथा काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं मोडली आहे. या मतदारसंघातून निवडून आलेला खासदार सर्वाधिक १३ दिवस विरोधी बाकांवर बसला आहे. मात्र आता पुढील ३ वर्ष मंडी लोकसभेत निवडून आलेला खासदार विरोधी बाकांवर बसणार आहे. मंडी लोकसभा जागेबाबत इतिहास पाहिला तर याठिकाणी १९५२ मध्ये दोन सदस्य निवडून आले होते. त्यावेळी गोपी राम आणि रानी अमृतमौर खासदार बनल्या होत्या.

त्यानंतर १९५७ च्या मंडीचे राजा जोगिंदर सेन, १९६२ आणि १९६७ मध्ये सुकेतचे राजा ललित सेन, १९७१ मध्ये वीरभद्र सिंह निवडणुकीत जिंकले होते. या सर्वांच्या काळात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. १९७७ मध्ये ठाकूर गंगा सिंह जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर केंद्रात जनता पार्टीचं सरकार आलं. १९८० मध्ये वीरभद्र सिंह जिंकले आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता आली. १९८४ मध्ये पंडित सुख राम यांचा विजय झाला. ते इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये सहभागी होते. १९८९ मध्ये जेव्हा या मतदारसंघातून भाजपाचे महेश्वर सिंह जिंकून आले तेव्हा केंद्रात भाजपाच्या पाठिंब्याने वीपी सिंह यांचं सरकार बनलं. १९९१ मध्ये पंडित सुखराम जिंकले ते संचार मंत्री झाले. १९९६ मध्ये पुन्हा पंडित सुखराम जिंकले आणि केंद्रात काँग्रेसच्या पाठिंब्यानं देवगौडा सरकार बनलं.

१९९६ मध्ये जेव्हा पंडित सुखराम यांचा विजय झाला त्यावेळी अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. परंतु अवघे १३ दिवस हे सरकार चाललं. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार बनलं. १९९८, १९९९ मध्ये भाजपाचे महेश्वर सिंह खासदार बनले आणि केंद्रात भाजपा अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर प्रतिभा सिंह यांनी विजय मिळवला. तर २००९ मध्ये वीरभद्र सिंह निवडून आले. दोन्ही वेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. २०१३ मध्ये पोटनिवडणुकीत प्रतिभा सिंह निवडून आल्या. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे रामस्वरुप शर्मा खासदार बनले. तेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. परंतु पोटनिवडणुकीत ७० वर्षापासून सुरु असलेली प्रथा मोडली.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेश