शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Himachal Byelection Result: ७० वर्षाची प्रथा मोडली; मंडीमध्ये काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं इतिहास रचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 09:37 IST

१९९६ मध्ये जेव्हा पंडित सुखराम यांचा विजय झाला त्यावेळी अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. परंतु अवघे १३ दिवस हे सरकार चाललं.

मंडी – हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा पोटनिवडणुकीत ७० वर्षाची प्रथा काँग्रेसच्या विजयी उमेदवारानं मोडली आहे. या मतदारसंघातून निवडून आलेला खासदार सर्वाधिक १३ दिवस विरोधी बाकांवर बसला आहे. मात्र आता पुढील ३ वर्ष मंडी लोकसभेत निवडून आलेला खासदार विरोधी बाकांवर बसणार आहे. मंडी लोकसभा जागेबाबत इतिहास पाहिला तर याठिकाणी १९५२ मध्ये दोन सदस्य निवडून आले होते. त्यावेळी गोपी राम आणि रानी अमृतमौर खासदार बनल्या होत्या.

त्यानंतर १९५७ च्या मंडीचे राजा जोगिंदर सेन, १९६२ आणि १९६७ मध्ये सुकेतचे राजा ललित सेन, १९७१ मध्ये वीरभद्र सिंह निवडणुकीत जिंकले होते. या सर्वांच्या काळात केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. १९७७ मध्ये ठाकूर गंगा सिंह जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर केंद्रात जनता पार्टीचं सरकार आलं. १९८० मध्ये वीरभद्र सिंह जिंकले आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता आली. १९८४ मध्ये पंडित सुख राम यांचा विजय झाला. ते इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये सहभागी होते. १९८९ मध्ये जेव्हा या मतदारसंघातून भाजपाचे महेश्वर सिंह जिंकून आले तेव्हा केंद्रात भाजपाच्या पाठिंब्याने वीपी सिंह यांचं सरकार बनलं. १९९१ मध्ये पंडित सुखराम जिंकले ते संचार मंत्री झाले. १९९६ मध्ये पुन्हा पंडित सुखराम जिंकले आणि केंद्रात काँग्रेसच्या पाठिंब्यानं देवगौडा सरकार बनलं.

१९९६ मध्ये जेव्हा पंडित सुखराम यांचा विजय झाला त्यावेळी अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. परंतु अवघे १३ दिवस हे सरकार चाललं. त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यानं केंद्रात सरकार बनलं. १९९८, १९९९ मध्ये भाजपाचे महेश्वर सिंह खासदार बनले आणि केंद्रात भाजपा अटल बिहारी वाजयेपी यांचे सरकार बनलं. २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर प्रतिभा सिंह यांनी विजय मिळवला. तर २००९ मध्ये वीरभद्र सिंह निवडून आले. दोन्ही वेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. २०१३ मध्ये पोटनिवडणुकीत प्रतिभा सिंह निवडून आल्या. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपाचे रामस्वरुप शर्मा खासदार बनले. तेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. परंतु पोटनिवडणुकीत ७० वर्षापासून सुरु असलेली प्रथा मोडली.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाHimachal Pradeshहिमाचल प्रदेश