शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

देशातील 'या' शहरात उष्णतेचा कहर, सर्वाधिक तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 10:39 IST

देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे. तेथील कमाल तापमान 45 अंशांवर दाखल झाले आहे.

ठळक मुद्दे देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे.राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी शुक्रवारी 49.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.तब्बल 75 वर्षांनी पुन्हा एकदा राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली .

नवी दिल्ली - देशात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे. तेथील कमाल तापमान 45 अंशांवर दाखल झाले आहे. राजधानी दिल्लीही तापली असून, कमाल तापमान 45 अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. देशात एक असं शहर आहे जिथे तब्बल 49 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे; हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण आहे.

राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी शुक्रवारी (31 मे) 49.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने देशातील सर्वात तप्त दिवस या ठिकाणी नोंदवला गेला असल्याची माहिती दिली आहे. श्री गंगानगर येथे याआधी 30 मे 1944 मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळी 49.4 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यानंतर आता तब्बल 75 वर्षांनी पुन्हा एकदा राजस्थानमधील श्री गंगानगरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. 

बीकानेरमध्ये 46.6  अंश सेल्सिअस, जैसलमेरमध्ये 46.5 अंश सेल्सिअस, जोधपूर 44.7  अंश सेल्सिअस, कोटा 44.6 अंश सेल्सिअस, अजमेर 44.5  अंश सेल्सिअस, बाडमेर 44.5  अंश सेल्सिअस, जयपूर 44.2  अंश सेल्सिअस आणि उदयपूरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमान वाढल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. देशातही उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये सर्वाधिक तापमानाचे दिवस नोंदवले गेले आहेत. 

आणखी तीन दिवस राहणार ‘ताप’दायक वातावरण

राज्यातील तापमानातही वाढ झाली आहे. विदर्भात अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या हवामानात काहीच बदल नोंदविण्यात येणार नसल्याची चिन्हे आहेत. परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील हवामान तापदायकच राहणार असून, 2 जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. चंद्रपूरचे गुरुवारचे कमाल तापमान 46.8 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, हे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान आहे. मुंबईचे कमाल तापमान 34.3 अंश नोंदविण्यात आले असून, ‘ताप’दायक ऊन आणि आर्द्रता मुंबईकरांना घाम फोडत आहे. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये कमीत कमी एक आठवडाभर तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील. नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर आणि मालेगाव येथे कमाल तापमान अधिक राहील. येथे किमान तापमानही 30 अंश राहील.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानTemperatureतापमान