शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जनास बंदी घालण्याचा प. बंगालचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द, ममता बॅनर्जींना चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 16:52 IST

मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जनाला बंदी घालण्याचा ममता बॅनर्जी सरकारचा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. राज्य सरकार असे मनमानी आदेश देऊ शकत नाही असेही कोर्टाने सुनावले आहे

ठळक मुद्देमुहर्रम बरोबरच सगळया दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत दुर्गा विसर्जनास उच्च न्यायालयाने मंजुरी दिलीकाहीतरी अघटित घडेल असं तुमच्या स्वप्नात आलं म्हणून तुम्ही निर्बंध लादलेत असं होता कामा नये असं खंडपीठानं नमूद केलं

नवी दिल्ली, दि. 21 - मुहर्रमच्या दिवशी दुर्गा विसर्जनाला बंदी घालण्याचा ममता बॅनर्जी सरकारचा निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. राज्य सरकार असे मनमानी आदेश देऊ शकत नाही असेही कोर्टाने सुनावले आहे. मुहर्रमच्या दिवशीच दुर्गा विसर्जन येत असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुर्गा विसर्जन त्यादिवशी न करता नंतर करावे असा आदेश पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला होता.मुहर्रम बरोबरच सगळया दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत दुर्गा विसर्जनास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मुहर्रमच्या ताजियाची मिरवणूक व दुर्गा विसर्जनाची मिरवणूक यांचे मार्ग ठरवून द्यावेत असे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. भावना लक्षात न घेता राज्य सरकार नागरिकांचे अधिकार अशा रीतीने संकुचित करू शकत नाही अशी टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली आहे. तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून तिचा तुम्ही असा टोकाला जाऊन वापर करत आहात असा सक्त ताशेरा ओढत तुम्ही असा मनमानी आदेश कसा काय देऊ शकता असा सवालही कोर्टाने राज्य सरकारला विचारला आहे.

पाच दिवसांच्या दुर्गा उत्सवानंतर करण्यात येणाऱ्या दुर्गा विसर्जनावर घालण्यात आलेल्या या बंदीविरोधात तीन जनहित याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. विजया दशमी आणि मुहर्रम एकाच दिवशी येतात म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडेल असं गृहीत धरून सरकारनं वागता कामा नये असेही हंगामी मुख्य न्यायाधीश राकेश तिवारी यांनी म्हटले आहे.

काहीतरी अघटित घडेल असं तुमच्या स्वप्नात आलं म्हणून तुम्ही निर्बंध लादलेत असं होता कामा नये असं खंडपीठानं नमूद केलं आहे. विजया दशमी 30 सप्टेंबर रोजी असून दुसऱ्या दिवशी मुहर्रम आहे. ताजियाची मिरवणूक आणि दुर्गा विसर्जनाची मिरवणूक यांच्या मध्ये खटका उडू शकतो अशा भीतीमुळे ममता बॅनर्जी सरकारने 30 सप्टेंबर रोजी रात्री 10 नंतर आणि 1 ऑक्टोबर रोजी संपूर्ण दिवस दुर्गा विसर्जन न करण्याचा आदेश दिला होता. हायकोर्टाचा हा निर्णय ममता बॅनर्जी सरकारसाठी चांगलीच चपराक मानण्यात येत आहे.

प्रत्येक धर्मीयाला त्यांच्या धार्मिक प्रथा पाळता यायला हव्यात असे सांगत, कोर्टाने भरभक्कम कारणाखेरीज त्यांना वंचित ठेवता येणार नाही असे स्पष्ट केले. तसेच, हिंदू व मुस्लीमांनी एकोप्याने रहावे आणि त्यांना अशा आदेशांद्वारे वेगळं करण्याचा प्रयत्न करू नये असेही न्यायाधीश तिवारी यांनी सुनावले आहे.

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७High Courtउच्च न्यायालय