शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

राफेल करारातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच मोदींनी सीबीआयच्या संचालकांना हटवले, राहुल गांधींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 20:09 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल विमान करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. राफेल विमान करारातील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआय संचालकांना रात्री दोन वाजता पदावरून हटवल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच राफेल करारातील भ्रष्टाचारासंबंधीचे महत्त्वपूर्ण पुरावे मोदींनी नष्ट केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. 

 राहुल गांधी यांनी सांगितले की, सीबीआयच्या संचालकांची नियुक्ती तीन जणांची समिती करते. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा या समितीमध्ये समावेश असतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयच्या संचालकांना रात्री दोन वाजता पदावरून हटवले. हा संविधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेत्यांचा अवमान आहे. तसेच हा भारतीय जनतेचाही अवमान असून, हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य आहे. 

 

यावेळी एम. नागेश्वर राव यांच्या सीबीआयच्या हंगामी संचालकपदी करण्यात आलेल्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सीबीआयकडून राफेल करारामधील पंतप्रधानांच्या भूमिकेची आणि कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी पावले उचलण्यात येत होती. त्यामुळेच मोदींनी रात्री दोन वाजता सीबीआय संचालकांना पदावरून हटवले. जर राफेल कराराची चौकशी झाली तर सर्व सत्य समोर येईल. देशाला कळेल की, पंतप्रधानांनी भ्रष्टाचार करून अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवला आहे," असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डील