शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'अहो मोदी, थोडी तरी लाज बाळगा, किती बिनधास्त खोटं बोलता!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 10:49 IST

अमेठीतील शस्त्रास्त्र कारखान्याचे उद्धाटन मी स्वतः 2010 मध्ये केले होते. गेल्या काही वर्षांपासून तेथून शस्त्रास्त्रे बनविली जात आहेत.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हीन शब्दात टीका केली. मोदीजी, तुम्ही किती बिनधास्त खोटं बोलता, तुम्हाला थोडीही लाज वाटत नाही का ? असा प्रश्न राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींना विचारला आहे. पंतप्रधान मोदींनी अमेठी येथे केलेल्या भाषणाचा संदर्भ देत राहुल यांनी मोदींवर टीका केली आहे. 

अमेठीतील शस्त्रास्त्र कारखान्याचे उद्धाटन मी स्वतः 2010 मध्ये केले होते. गेल्या काही वर्षांपासून तेथून शस्त्रास्त्रे बनविली जात आहेत. रविवारी तुम्ही अमेठीला गेला आणि आपल्या स्वभावाप्रमाणे पुन्हा एकदा खोटे बोललात. तुम्हाला, खरंच लाज वाटत नाही का? असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. रविवारी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीत सभा घेतली. यावेळी भारत आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने साकार झालेल्या 'एके-203' या रायफलींच्या निर्मिती कारखान्याचा प्रारंभ मोदींच्या हस्ते झाला. त्यावेळी मोदींनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. मोदींच्या या टीकेला राहुल गांधींनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. 

राहुल यांच्या या ट्विटवरुन केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलंय. राहुल गांधींना विकास बघवत नाही. अमेठीत होत असलेल्या विकासाचा त्रास राहुल गांधींना होत असल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. तसेच रविवारी मोदींनी कोरवा येथे JV चे उद्घाटन केले. त्यामुळे भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये एके 203 रायफलच्या निर्मित्तीला सुरूवात होणार आहे. राहुल गांधींना हे दिसत नाही का? असा प्रश्नही स्मृती इराणींनी विचारला आहे. 

स्मृती इराणी यांनी 27 ऑगस्ट 2010 रोजीची एक बातमी शेअर करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. जर कोरवा येथे 2010 साली तुम्ही पायाभरणी केली होती, तर 2007 मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीसंदर्भात जे झालं त्यावरही आपण प्रकाश टाकावा असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राहुल गांधी मेड इन उज्जैन, मेड इन इंदूर, मेड इन जयपूर सांगत असतात. मात्र, आम्ही मेड इन अमेठीचं स्वप्न साकार केलं, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला. मोदींनी रविवारी अमेठीत अत्याधुनिक क्लाशनिकोव-203 रायफल्सच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या ऑर्डनान्स फॅक्टरीचं उद्घाटन केलं आहे. त्यावेळी, राहुल गांधींवर टीका केली होती.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीSmriti Iraniस्मृती इराणी