शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

इथे भारत-पाकिस्तानचे लष्कर बनले मित्र, एकमेकांसोबत केला युद्धसराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 16:25 IST

भारत आणि पाकिस्तान यांचे नाते सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असेच. त्यात सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या लष्करांचे संबंधही नेहमी ताणलेलेच असतात. अशा परिस्थितीत...

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांचे नाते सख्खे शेजारी आणि पक्के वैरी असेच. त्यात सीमेपलीकडून होणाऱ्या कारवाया आणि दहशतवादामुळे दोन्ही देशांच्या लष्करांचे संबंधही नेहमी ताणलेलेच असतात. अशा परिस्थितीत एकमेकांवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही देशांच्या सैन्याने एकत्र येऊन युद्धसराव केला असे सांगितल्यास कुणाला खरे वाटणार नाही. मात्र भारत आणि पाकिस्तानचे लष्कर सध्या रशियामध्ये एकत्र येऊन युद्धसराव करत आहेत. रशियातील चेल्याबिन्स्क येथे  शांतता मोहीम 2018 अंतर्गत शुक्रवारपासून हा संयुक्त युद्धसराव सुरू झाला आहे. या युद्धसरावामध्ये शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये समावेश असलेले सर्व देश सहभागी झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान हेसुद्धा चीनचा प्रभाव असलेल्या या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे हे दोन्ही देशांनीही या युद्धसरावात भाग घेतला आहे. या सरावाबाबत लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की "या युद्धसरावामुळे शांघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी असलेल्या देशांना दहशतवादविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचे प्रशिक्षण मिळेल. या प्रशिक्षणादरम्यान, औपचारिक चर्चा, कारवाईदरम्यान आपापसातील ताळमेळ, संयुक्त कमांडची स्थापना, कंट्रोल स्ट्रक्चर आणि दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्याबाबतच्या मॉक ड्रिलसारखा अभ्यास करण्यात येणार आहे."

या युद्धसरावामध्ये यजमान रशियाचे 1700, चीनचे 700 आणि भारताचे 200 जवान सहभागी झाले आहेत. भारताकडून पाठवण्यात आलेल्या जवानांमध्ये राजपूत रेजिमेंट आणि हवाई दलाच्या जवानांचा समावेश आहे.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानrussiaरशिया