शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Helicopter Crash : जवानांचा जीव वाचविण्यासाठी ग्रामस्थांची झाडी-चिखलातून 3 किमी पायपीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 12:53 IST

पत्नीटापच्या शिवगढ धार परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. याचदरम्यान, सैन्यदलाचे हेलिकॉप्टर येथून जात होते, पण पावसामुळे ते माघारी फिरले. त्यामुळे, ते जंगलात गिरक्या घेऊन लागले.

ठळक मुद्देघटनास्थळी पोहोचल्यानंतर स्थानिकांना परिस्थितीचा आढाव घेतला, त्यावेळी इंजिनचा स्फोट होण्याचा धोका होता. तरीही, स्थानिकांनी मदत व बचावकार्यासाठी आगेकूच केली.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे सैन्य दलाचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. त्यामध्ये, दोन जवान जखमी झाले असून स्थानिकांनी मदतीसाठी धावपळ केल्याचे दिसून आले. दरवेळी संकटातील माणसांना वाचविण्यासाठी सैन्य दल आपल्या जीवाची बाजी लावून धावपळ करत असते. आता, पत्नीटॉपच्या शीवगढ धार येथे संकटात सापडलेल्या सैन्यातील जवानांसाठी स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावल्याचं पाहायला मिळालं. 

सैन्य दलाचे हेलिकॉप्टरला येथील परिसरात अपघात झाला होता. त्यावेळी, हेलिकॉप्टरचे इंजिन सुरू असताना स्थानिकांनी धाव घेत पायलट आणि सहपायलट यांना बाहेर काढले. त्यानंतर, बाजेवर टाकून तब्बल तीन किमीचा रस्ता डोंगरवाटांतून, पावसाच्या पाण्यातून पार केला. लोकांनी जवानांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण, दुर्दैवाने पायलटचे निधन झाले. 

पत्नीटापच्या शिवगढ धार परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. याचदरम्यान, सैन्यदलाचे हेलिकॉप्टर येथून जात होते, पण पावसामुळे ते माघारी फिरले. त्यामुळे, ते जंगलात गिरक्या घेऊन लागले. या, दरम्यान, मोठा आवाज झाला. घनदाट जंगलात हेलिकॉप्टर दिसून येत नव्हते, पण त्याच्या इंजिनचा आवाज येत होता. हा आवाज ऐकून सर्वप्रथम दोन महिला दर्शनादेवी आणि शक्तीदेवी घटनास्थळी पोहोचल्या. या दोन्ही महिलांचे घर घटनास्थळावरून 400 किमी अंतरावर होते. त्यामुळे, या महिलांना इतरांना आवाज देत बोलावून घेतले. त्यानंतर, परिसरातील लोक मदतीला धावून आले. 

घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्थानिकांना परिस्थितीचा आढाव घेतला, त्यावेळी इंजिनचा स्फोट होण्याचा धोका होता. तरीही, स्थानिकांनी मदत व बचावकार्यासाठी आगेकूच केली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर पायलट आणि सहपायलट यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, त्यांना करलाहपर्यंत गावकऱ्यांनीच पोहोचले. तोपर्यंत पोलीस आणि सैन्यातील काही अधिकारीही पोहोचले. तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ऊधमपूर येथील सैन्याच्या हॉस्पीटलमध्ये त्यांना पाठविण्यात आले. मात्र, एवढे प्रयत्न करूनही जवानांचा जीव वाचविण्यात अपयश आलं. दोन्ही जवानांच्या वीरमरणाच्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली.    

टॅग्स :AccidentअपघातIndian Armyभारतीय जवानHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना