शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Bharat Bandh: राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात पोलिसांचा चोख बंदोबस्त; अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 08:58 IST

गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नवी दिल्ली: शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमधील जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. २ एप्रिलला देशातील दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या बदलांविरोधात २ एप्रिल रोजी दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंद दरम्यान उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंसाचार झाला होता. याच बंदला उत्तर म्हणून जातीवर आधारित आरक्षणाविरोधात काही संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. अधिकृतपणे कोणत्याही मोठ्या संघटनेकडून जाहीरपणे भारत बंदची हाक देण्यात आलेली नाही. मात्र तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा लक्षात घेता पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मध्य प्रदेशच्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. राजस्थानातील काही भागांमध्येही संचारबंदी लागू करुन निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील हापुड जिल्ह्यात अफवा पसरु नयेत म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने काही बदल सुचवले होते. या बदलांमुळे हा कायदाच कमकुवत होईल, असा आक्षेप अनेक दलित संघटनांनी नोंदवला होता. त्यामुळे दलित संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदचा सर्वाधिक परिणाम मध्य प्रदेश आणि राजस्थानात पाहायला मिळाला होता. या बंदनंतर जातीवर आधारित आरक्षणाविरोधात १० एप्रिल रोजी भारत बंदची हाक देणारे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले जात होते. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदSocial Mediaसोशल मीडिया