शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

परतीच्या पावसाने दाणादाण! केरळमध्ये कहर; राज्यात साेयाबीन, धान व कापसाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 06:53 IST

केरळात अतिवृष्टीचे २३ बळी; विदर्भ, मराठवाड्याला फटका

नवी दिल्ली/मुंबई : परतीच्या मोसमी पावसाने देशभरात सर्वत्र दाणादाण उडवली आहे. राजधानी दिल्लीत रविवारी जोरदार पाऊस झाला. तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेत केरळमध्ये तर पावसाने हाहाकार उडवला असून तिथे पाच जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध दुर्घटनांमध्ये केरळात २३ जण मृत्युमुखी पडले. दरम्यान, राज्यालाही परतीच्या पावसाचा फटका बसला असून मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने पिकांचे नुकसान झाले.  तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहा:कार उडवला असून दरडी कोळणे, भूस्खलन, महापूर अशा विविध घटनांमध्ये राज्यभरात रविवारी २३ जणांचा मृत्यू झाला. पुरामध्ये अडकलेल्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ व लष्कराने कोट्टयम जिल्ह्यातील कुट्टीकल व कोकयार भागात मदतकार्य सुरू केले आहे. पावसाचा सर्वांत जास्त तडाखा इडुक्की व कोट्टयम या जिल्ह्यांना बसला आहे. कोट्टयम जिल्ह्यात १२ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला. इडुक्की व आणखी काही भागांत पावसाने ११ जणांचा बळी घेतला. कोट्टयम, इडुक्की, पतानामतिटा या ठिकाणच्या डोंगराळ भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मीनाचल व मणिमला या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रचंड पावसामुळे केरळच्या बहुतांश जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे. पूरस्थितीमुळे काही लहान शहरे, गावांचा संपर्क तुटला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती हवामान खात्याने दिल्याचे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले. पुराच्या पाण्याने वेढलेल्या रहिवाशांची सुटका करण्यासाठी लष्कर, हवाई दल तसेच नौदलाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले आहे. वेळप्रसंगी एमआय-१७ व सारंग या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडून दखल केरळमधील पावसाच्या कहराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाच्या तडाख्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करणारे ट्विटही मोदी यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही केरळ सरकारशी संपर्क साधत केंद्रातर्फे सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.विदर्भ, मराठवाड्याला फटका; पिकांचे मोठे नुकसानऔरंगाबाद/नागपूर/जळगाव : राज्यातून मान्सून परतल्याची वर्दी दिल्यानंतरही शनिवार रात्रीपासून विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह जळगावमध्येही जोरदार हजेरी लावली. नंदुरबार व नाशिकमध्ये रविवारी हलका पाऊस झाला. पावसाने विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात साेयाबीन, धान व कापसाला फटका बसला. नद्यांना पूर आल्याने अनेक धरणांतून पुन्हा विसर्ग सुरू झाला आहे.मराठवाडा : बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, वडवणी, शिरूर व केज तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू आहे. हिंगोली परिसरात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे कापणी करून ठेवलेला सोयाबीनचा ढीग वाहून जात होता. विदर्भ : विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गडचिराेली, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यांत रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाचा प्रामुख्याने साेयाबीन, धान व कापूस पिकांना फटका बसला. चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीनसह धानाचेही  नुकसान झाले. गडचिराेली, बुलडाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यांत रविवारी ठिकठिकाणी पाऊस झाला.उत्तर महाराष्ट्रातही पावसाने हाहाकारपावसाने जळगाव जिल्ह्याला झोडपले. रविवारी झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. धरणसाठ्यातही मोठी वाढ झाली. वाघूर धरणाचे आठ तर हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले. पावसाचा जामनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. पावसाने कापूस ओला झाला तर भाजीपाला व इतर पिकांवरही परिणाम होणार आहे. नाशिकला रविवारी संध्याकाळी पाऊस झाला. नंदुरबारमध्येही पाऊस झाला.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर