शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पाऊस, उष्मा, वादळे आदी संकटांमुळे देशात दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 08:18 IST

हवामान खात्याचा अहवाल; अकरा वर्षांतील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : देशामध्ये पडणारा मुसळधार पाऊस, वीज कोसळणे, वादळे, थंडीची लाट, वाढता उष्मा, धुळीची वादळे आदी घटनांमुळे २०१० ते २०२१ या अकरा वर्षांमध्ये दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भातील आकडेवारी हवामान खात्याने गोळा केली आहे. 

हवामानाशी निगडित विविध आपत्तींमुळे गेल्या ११ वर्षांत देशात ३२,०४३ लोकांचा मृत्यू झाला. त्याची सरासरी काढल्यास दर दिवशी आठ लोकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेही हवामान बदलाविषयी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, विसाव्या शतकात मध्य भारतातील तापमानात वाढ व पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी अवर्षणाची स्थिती निर्माण झाली. समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, १९०१ ते २०१८ या कालावधीत भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. १९८६ ते २०१५ या ३१ वर्षांच्या कालावधीत सर्वात उष्ण दिवस व सर्वात कडाक्याच्या थंडीची रात्र यांच्या तापमानात अनुक्रमे ०.६३ अंश सेेल्सिअस व ०.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

गंगा, सिंधू खोऱ्यात उष्मा

तापमान व आर्द्रता यांच्यात झालेल्या वाढीमुळे गंगा व सिंधू नदीच्या खोऱ्यात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. १९५१ ते २०१५ या कालावधीत हिंद महासागराच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

- १३,३०३ जणांचा २०१० ते २०२१ या कालावधीत मध्य भारतात मुसळधार पावसामुळे झाला. 

- ६.४९५ उष्माघाताने मृत्यू, २,४८९ थंडीने मृत्यू, ३,८३२ वादळामुळे मृत्यू, ८९५ जणांचा मृत्यू चक्रीवादळामुळे, ४४६ धुळीच्या वादळांमुळे जणांना जीव गमवावा लागला. ३४५ तुफान हिमवृष्टीमुळे  जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :RainपाऊसHeat Strokeउष्माघात