शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मुसळधार पाऊस, उष्मा, वादळे आदी संकटांमुळे देशात दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 08:18 IST

हवामान खात्याचा अहवाल; अकरा वर्षांतील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : देशामध्ये पडणारा मुसळधार पाऊस, वीज कोसळणे, वादळे, थंडीची लाट, वाढता उष्मा, धुळीची वादळे आदी घटनांमुळे २०१० ते २०२१ या अकरा वर्षांमध्ये दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भातील आकडेवारी हवामान खात्याने गोळा केली आहे. 

हवामानाशी निगडित विविध आपत्तींमुळे गेल्या ११ वर्षांत देशात ३२,०४३ लोकांचा मृत्यू झाला. त्याची सरासरी काढल्यास दर दिवशी आठ लोकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेही हवामान बदलाविषयी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, विसाव्या शतकात मध्य भारतातील तापमानात वाढ व पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी अवर्षणाची स्थिती निर्माण झाली. समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, १९०१ ते २०१८ या कालावधीत भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. १९८६ ते २०१५ या ३१ वर्षांच्या कालावधीत सर्वात उष्ण दिवस व सर्वात कडाक्याच्या थंडीची रात्र यांच्या तापमानात अनुक्रमे ०.६३ अंश सेेल्सिअस व ०.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

गंगा, सिंधू खोऱ्यात उष्मा

तापमान व आर्द्रता यांच्यात झालेल्या वाढीमुळे गंगा व सिंधू नदीच्या खोऱ्यात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. १९५१ ते २०१५ या कालावधीत हिंद महासागराच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

- १३,३०३ जणांचा २०१० ते २०२१ या कालावधीत मध्य भारतात मुसळधार पावसामुळे झाला. 

- ६.४९५ उष्माघाताने मृत्यू, २,४८९ थंडीने मृत्यू, ३,८३२ वादळामुळे मृत्यू, ८९५ जणांचा मृत्यू चक्रीवादळामुळे, ४४६ धुळीच्या वादळांमुळे जणांना जीव गमवावा लागला. ३४५ तुफान हिमवृष्टीमुळे  जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :RainपाऊसHeat Strokeउष्माघात