शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

मुसळधार पाऊस, उष्मा, वादळे आदी संकटांमुळे देशात दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 08:18 IST

हवामान खात्याचा अहवाल; अकरा वर्षांतील आकडेवारी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : देशामध्ये पडणारा मुसळधार पाऊस, वीज कोसळणे, वादळे, थंडीची लाट, वाढता उष्मा, धुळीची वादळे आदी घटनांमुळे २०१० ते २०२१ या अकरा वर्षांमध्ये दररोज सरासरी आठ जणांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भातील आकडेवारी हवामान खात्याने गोळा केली आहे. 

हवामानाशी निगडित विविध आपत्तींमुळे गेल्या ११ वर्षांत देशात ३२,०४३ लोकांचा मृत्यू झाला. त्याची सरासरी काढल्यास दर दिवशी आठ लोकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेही हवामान बदलाविषयी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, विसाव्या शतकात मध्य भारतातील तापमानात वाढ व पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. तसेच काही ठिकाणी अवर्षणाची स्थिती निर्माण झाली. समुद्राच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, १९०१ ते २०१८ या कालावधीत भारताच्या सरासरी तापमानात ०.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. १९८६ ते २०१५ या ३१ वर्षांच्या कालावधीत सर्वात उष्ण दिवस व सर्वात कडाक्याच्या थंडीची रात्र यांच्या तापमानात अनुक्रमे ०.६३ अंश सेेल्सिअस व ०.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

गंगा, सिंधू खोऱ्यात उष्मा

तापमान व आर्द्रता यांच्यात झालेल्या वाढीमुळे गंगा व सिंधू नदीच्या खोऱ्यात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. १९५१ ते २०१५ या कालावधीत हिंद महासागराच्या तापमानात १ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

- १३,३०३ जणांचा २०१० ते २०२१ या कालावधीत मध्य भारतात मुसळधार पावसामुळे झाला. 

- ६.४९५ उष्माघाताने मृत्यू, २,४८९ थंडीने मृत्यू, ३,८३२ वादळामुळे मृत्यू, ८९५ जणांचा मृत्यू चक्रीवादळामुळे, ४४६ धुळीच्या वादळांमुळे जणांना जीव गमवावा लागला. ३४५ तुफान हिमवृष्टीमुळे  जणांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :RainपाऊसHeat Strokeउष्माघात