शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

२१ राज्यांत मुसळधारेचा इशारा; दिल्ली तुंबली, केरळमध्ये दाणादाण, कर्नाटकात रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:16 IST

९ राज्यांत मान्सूनची धमाकेदार एन्ट्री

नवी दिल्ली : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने देशभर पाऊस पडत असून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारसह दक्षिणकडे केरळपर्यंत सर्वत्र पावसाचा जोर आहे. दिल्लीत मुसळधार पावसाने रस्ते तुंबले असून उत्तरेकडील अनेक राज्यांत पाऊस सुरू झाला आहे. सोमवारी ९ राज्यांत मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली आहे. 

देशभर मान्सूनची वाटचाल सुरू असून २१ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २४ मे रोजी दक्षिण भारतात मान्सून दाखल झाल्यानंतर २५ मेपर्यंत तो गोवा, मिझोराम, मणिपूर, नागालँडसह महाराष्ट्रातही पोहोचला आहे. 

मंगळवारी केरळ, कर्नाटक, गोवा, कोकण, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या भागांत दमदार पाऊस पडेल. या भागात भूस्खलन व सखल भागांसाठी इशारा देण्यात आला आहे. 

१० मजली इमारतीएवढी लाट आली, सौरव गांगुलीचा भाऊ-वहिनी बचावले

पुरी : येथील समुद्रात स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातातून क्रिकेटपटू सौरव गांगुली याचा भाऊ स्नेहाशीष गांगुली व त्याची पत्नी अर्पिता हे थोडक्यात बचावले. शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला.  ही स्पीड बोट एका उंच लाटेला धडकली आणि उलटली. सुमारे १० मजली इमारतीएवढी ही लाट होती, असे अर्पिताने सांगितले. या बोटीमध्ये कमी प्रवासी होते आणि समुद्र खळवळलेला होता. त्यामुळे लाटेला धडकताच बोट उलटून प्रवासी पाण्यात फेकले गेल्याचे तिने सांगितले. अर्पिता या अपघातानंतर प्रचंड धास्तावली आहेत.

देशात कुठे काय घडले?    दक्षिण बंगालमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून २८ मेपासून राज्याचा अनेक भाग मुसळधार पावसाने व्यापेल. 

दिल्लीत अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीचा खोळंबा. 

कर्नाटकच्या सीमा भागांत सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड पाऊस. या सर्व भागांत पाच दिवसांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 

केरळच्या उत्तरेकडील भागांत मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक लोक विस्थापित झाले आहेत. त्यांच्यासाठी मदत छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.  उत्तर प्रदेशात २७ जिल्ह्यांत वेगवान वाऱ्यासह अनेक भागाला पावसाने झोडपले.

सौदीत तापमान ५१.६ अंशावर

संयुक्त अरब अमिरातीने सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा विक्रम मोडला. येथील तापमान ५१.६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. जे देशातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाच्या म्हणजेच ५२ अंश सेल्सिअसजवळ पोहोचले आहे. येथील लोक उष्णतेने होरपळत आहेत. 

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्लीKarnatakकर्नाटक