शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर! केदारनाथ मार्गावरून 2500 भाविकांचे रेस्क्यू, दर्शनासाठी गेलेले 16 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 12:33 IST

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे.

केदारनाथ खोऱ्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसानंतर सरकारने बचावकार्य तीव्र केले आहे. केदारनाथ परिसरात अडकलेल्या जवळपास 2537 प्रवाशांचे रेस्क्यू करण्यात येत आहे. SDRF सोबतच लष्कराचे चिनूक आणि MI-17 हेलिकॉप्टरहीही बचाव कार्यासाठी अथवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी उतरले आहे. 

याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे. कुटुंबीयांचा या लोकांसोबतचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, वायएमएफ, डीडीआरएफ आणि पोलिसांचा चमू देखील बचाव कर्यात आहे.

लिंचोली आणि भिमबली येथे अडकलेल्या लोकांना शेरसी येथे पोहोचवले जात आहे. काही यात्रेकरूंना गौरीकुंडावरून पगडंडी मार्गे सोनप्रयागला आणले जात आहे. गौरीकुंड ते सोनप्रयाग दरम्यानचा जवळपास 100 मीटर भाग उध्वस्त झाला आहे. डीएम सौरभ गहरवार आणि एसपी विशाखा अशोक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास बचाव कार्य सुरू झाले आहे.

भीमबलीच्या जवळपास अडकलेल्या 737 यात्रेकरुंना हेलीकाप्टरच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. तर 200 यात्रेकरूंना रास्त्याने आण्यात आले आहे. या अभियानात पाच हेलिकाप्टरचा समावेश आहे.

सर्वाधिक यात्रेकरू गौरीकुंडाजवळ अडकलेले आहेत. एसडीआरएफचे कमांडन्ट मणिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीकुंड येथून 1700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी अद्यापही 1300 जण अडकलेले आहेत. अलास्का लाइटच्या मदतीने रात्रभर रेस्क्यू  ऑपरेशन सुरू राहणार आहे.

एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये 1100 ते 1400 भाविक, लिंचौलीमध्ये 95 तसेच भीमबलीमध्ये जवळपास 150 यात्रेकरू अडकलेले आहेत. याशिवाय, कुमाऊंमध्येही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मंडलमध्ये अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. 

टॅग्स :KedarnathकेदारनाथPoliceपोलिस